
Mumbai News, 09 Jan : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) मिळालेल्या भरघोस यशामुळे आपण गाफील राहिलो. मात्र, विरोधकांनी पराभवाच्या कारणांचा शोध घेतला आणि संघांच्या स्वयंसेवकांनी निवडणूक हातात घेतल्यामुळे महायुतीचा विधानसभा निवडणुकीत विजय झाल्याची कबुलीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीता सुपडासाफ झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला या निवडणुकीत केवळ 10 जागांवर समाधान मानावं लागलं. तर विधानसभेत झालेला पराभव मान्य करत शरद पवारंनी (Sharad Pawar) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकांसाठी दंड थोपटले आहेत.
तर विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव नेमका कशामुळे झाला याचा आढावा घेण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबईत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या आढावा बैठकीदरम्यान विधानसभा निवडणुकीत आपण गाफील राहिल्याची कबुली राष्ट्रवादीचे (शरद पवार) सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे. तर महायुतीला (Mahayuti) मिळालेल्या भरघोस यशामागे आरएसएसने केलेल्या प्रचाराचा मोठा वाटा असल्याचंही पवार यांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय आढावा बैठकीला बुधवारी मुंबईत सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले, लोकसभेतील यशामुळे आपण गाफील राहिलो, विधानसभेची निवडणूक हातचा मळ असल्याचा समज केला. मात्र, दुसरीकडे विरोधकांनी पराभवाची गांभीर्याने नोंद घेतली आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेत घरोघरी जाऊन हिंदुत्वाचा प्रचार केला. दोन्ही बाजू मतदारांना सांगितल्या त्याचा परिणाम निकालात पाहायला मिळाला, असं पवार म्हणाले.
मात्र, निवडणुकांचे यश शंभर टक्के कधीच नसते, आजपासून कामाला लागा आपल्याकडे पाच वर्षे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका तोंडावर आल्या असून या निवडणुकीत मोठी जोखीम घेणार आहे. महिलांना 50 टक्के तर खुल्या गटात 60 टक्के उमेदवारी तरुणांना दिली जाईल. प्रस्थापित घराण्यांमधील युवकांना प्राधान्य दिलं जाणार नाही. नव्या चेहऱ्यांना 70 टक्के वाटा देण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.