राणा दांपत्य विरुद्ध शिवसेना वादात प्रियांका चतुर्वेदींची उडी अन् केली कोंडी

सध्या शिवसैनिक विरुद्ध राणा दांपत्य असा संघर्ष सुरू असून, यामुळे वातावरण तापले आहे.
Priyanka Chaturvedi
Priyanka Chaturvedi Sarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचण्यावरुन राज्यात शिवसेना (Shivsena) विरुद्ध राणा दांपत्य असा संघर्ष पेटला आहे. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आता या वादात शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी उडी घेऊन राणा दांपत्याची कोंडी केली आहे.

राणा दांपत्याच्या खारमधील घरासमोर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले आहेत. प्रियांका चतुर्वेदीही आज तिथे थेट पोचल्या. त्यांनी राणा दांपत्याला थेट आव्हान देत त्यांची कोंडी केली आहे. त्या म्हणाल्या की, हनुमान चालिसाला आमचा विरोध नाही. आमचा विरोधी ढोंगी हनुमानभक्तांना आहे. राणा दांपत्य घरातून बाहेर पडत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसून राहू. ते घराबाहेर आल्यानंतर त्यांना आम्ही वडापाव खायला घालू आणि कोल्हापुरी मिरचीनं त्यांचं स्वागत करू. राणा दांपत्याचं आव्हान आम्ही स्वीकारल्यानं त्यांनी आता घराबाहेर पडून दाखवावं. ते घरातून बाहेर आले नाहीत तर ते हनुमानाचे बोगस भक्त सिद्ध होतील. त्यांनी घराबाहेर पडाव आम्ही त्यांना योग्य मार्ग दाखवू.

Priyanka Chaturvedi
राणा दांपत्याच्या आंदोलनातील जयंत पाटलांनी हवाच काढून घेतली!

शिवसैनिक आक्रमक झाल्याने पोलिसांनी सध्या राणा दांपत्याला मुंबईतील खारमधील घरातच नजरकैदेत ठेवलं असून 10 ते 12 वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस असा मोठा फौजफाटा त्यांच्या घरामध्ये तैनात करण्यात आला आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणावरील पोलीस बंदोबस्त राणा यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आला आहे. नवनीत राणा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होत्या, त्यावेळी पोलिसांनी त्यांना समजावून सुरक्षेच्या कारणास्तव बाहेर न पडण्याची विनंती केली. मात्र त्यानंतरही त्यांनी भूमिका न बदलल्याने पोलिसांनी राणा दाम्पत्याला नजरकैदेमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Priyanka Chaturvedi
मोठी बातमी : शिवसैनिक आक्रमक झाल्याने राणा दांपत्य माघार घेण्याच्या तयारीत?

याच सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा दौरा सोडून मुंबईकडे रवाना झाले आहेत. वळसे पाटील यांनी सर्वांना शांततेचे आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. माध्यमांशी बोलताना वळसे पाटील यांनी काही आरोप देखील केले आहेत. हे कोणाच्या तरी सांगण्यावरून सुरू आहे. राणा दाम्पत्याने कोणाची तरी सुपारी घेतली असावी. समाजात असंतोष निर्माण करण्याचे हे कृत्य आहे, असे वळसे पाटलांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com