Sanjay Raut : टोल कंपन्यांना सरकारी तिजोरीतून शेकडो कोटींचा परतावा? राऊतांचा 'टक्केवारी'चा गंभीर आरोप

MP Sanjay Raut criticism of the mahayuti: मुंबईतील बंद करण्यात आलेल्या टोलनाक्यामागील आर्थिक गणित मांडताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार टीका केली.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारने टोलनाका बंद करण्याच्या निर्णयामागील आर्थिक घडामोडींवरून गंभीर आरोप केला.

"टोलनाके मुदतपूर्व बंद केले आहेत. आता टोल कंपन्यांना शेकडो कोटी रुपयांचा परतावा सरकारच्या तिजोरीतून द्यावा लगणार आहे. यात 50 टक्के मिंधे, भाजप, राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहे", असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. आचारसंहिता लागण्यापूर्वी महायुती सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणांवर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. आचारसंहिता अगोदर महायुती (Mahayuti) सरकारकडून होत असलेल्या घोषणा म्हणजे कोरडा पाऊस. नुसते ढग गडगडले आहेत. खाली काहीच नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

Sanjay Raut
Sanjay Raut : 'अमित शाह, भाजपच्या त्यागाच्या भाषेवर राऊत कडाडले'; म्हणाले, 'महाराष्ट्रावर सूड...'

टोलनाके बंद करण्याच्या निर्णयावर मागील आर्थिक व्यवहारांवर मोठा आरोप संजय राऊत यांनी केला. ते म्हणाले, "टोलमाफीच्या संदर्भात झालेल्या निर्णयात मोठा घोटाळा आहे. टोल कंपन्यांचे करार, मुदतीअगोदर टोलमाफीचा निर्णय घेतल्याने, त्या कंपन्यांना शेकडो कोटींचा परतावा द्यावा लागणार आहे. त्यातले 50 टक्के हे मिंधे, भाजप (BJP) , राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहे. हे एक सूत्र ठरलं आहे. राज्याच्या तिजोरीतून टोल कंपन्यांना द्यावा लागणार आहे." अडीच वर्षात हजारो कोटी खर्च झाले आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

Sanjay Raut
Ajit Pawar: पक्षातील ‘आउटगोइंग’वर प्रश्न, अजितदादा चिडले अन् हिंदीतून फाडफाड बोलून गेले

'ईव्हीएम'चा अट्टहास का?

''ईव्हीएम' आणि आयोगाचं काय नात आहे, यावर आता न बोललं नाही. हरिणायात 'ईव्हीएम' मशिनशी निगडीत अनेक प्रकरणं समोर आली आहे. जगात 'ईव्हीएम' मशीन नष्ट केलं आहे. मग देशात अट्टहास का?',असा सवाल संजय राऊत यांनी केला.

ठाकरेंचा टोलनाक्यांवरून काय आहे इशारा

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीपुरता हा निर्णय होऊ नये, तसा होऊ देणार नाही. निवडणुकीनंतर देखील टोलनाके बंद राहाणार, असा इशारा दिला आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर देखील टोकनाक्यांवरून राज ठाकरेंनी संघर्षाची तयारी ठेवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com