
Mumbai News : राज्याच्या राजकीय वर्तुळातून आता मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गटामध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा होती. अजित पवारांच्या शपथविधीमध्ये राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आल्यानंतर शिंदे गटातील आमदार नाराज झाल्याची माहिती आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे. (Two MLA Clash Of Eknath Shinde group)
प्राप्त माहितीनुसार, मंत्रिपदावरून दाव्यांमुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये बाचाबाची झाली आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वत:ला मध्यस्थीसाठी यावे लागले. मुंबईत दोन आमदार एकमेकांना भिडले. या आमदारांच्या या वादावादीमुळेच शिंदेंना आपला नियोजित नागपूर दौरा, सोडून आमदारांचे भांडण सोडवण्यासाठी तातडीने मुंबईला परत यावे लागले, असे सांगण्यात येत आहे.
राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार येऊन, आता एक वर्षांपेक्षा अधिक काळ लोटून गेला. मात्र अजूनही सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झालेले नाही. मंत्रिमंडळ पहिल्या विस्तारामध्ये भाजपाचे आणि शिवसेनेचे अनुक्रमे प्रत्येकी ९ मंत्र्यांना शपथ देण्यात आली होती. मात्र शिंदेंचे इतर आमदार मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत आहेत.
जुलै महिन्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशी आशा शिंदे गटाच्या आमदारांना होती. इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र आता अजित पवार यांची सरकारमध्ये एन्ट्री झाली आहे. त्यांच्या नऊ आमदारांनी शपथही घेतली. यामुळे आता शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता असल्याची जोरदार चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.