
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या कॅबिनेटने मंगळवारी मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या प्रशासनात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी फडवीसांनी ई- कॅबीनेट प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्यामुळे राज्यशासनाचा कारभारात पारदर्शकता आणि गतिमानता यावी यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे काल, मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतच या प्रयोगाचा शुभारंभ झाला आहे.
(NIC) राष्ट्रीय माहिती केंद्रने विकसित केलेल्या 'ई - कॅबिनेट' प्रणालीचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण केले होते. कागदाची बचत होऊन पर्यावरण जपले जावे. यासाठी पेपरलेस काम करण्याची संकल्पना पुढे आली आहे. यानुसार देशातील अनेक राज्याने ई-कॅबिनेटची संकल्पना राबवत आहेत. हिमाचल प्रदेश, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांत ई-कॅबिनेट ही प्रणाली राबविली जात आहे.
आयसीटी आधारित या प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणावर होणारा वापर कमी होणार आहे. मंत्रिमंडळ सदस्यांसाठी सुलभ डॅशबोर्ड उपलब्ध होईल त्याचबरोबर संदर्भ शोधणे, कृती बिंदू (ॲक्शन पाईंट) पाहणे, निर्णयांचे पुनरावलोकन करणे सुलभ होईल.
ई-कॅबिनेटमुळे मंत्रिमंडळ बैठकांचे, निर्णयांचे व त्यासंबंधीच्या दस्तऐवजांचे जतन होईल. पारंपरिक मंत्रिमंडळ बैठकांमध्ये येणाऱ्या विविध अडचणींवर या प्रणालीमुळे मात करता येईल. मंत्रिमंडळासमोर चर्चा आणि निर्णयासाठी प्रस्ताव सादर आणि अंतिम निर्णय घेणे ही प्रक्रिया सुलभ होईल. पारंपरिक बैठकींतील कागदपत्रांच्या वितरणासाठीची धावपळ कमी होईल. अधिकारी- कर्मचाऱ्यांचा आणि मंत्रिमंडळाचा मोठा वेळ वाचणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.