सरकारनामा ब्यूरो
पुणे : अमंली पदार्थ विरोधी विभागाची सुरू असलेली कारवाई आणि त्यावर मंत्री नवाब मलिक घेत असलेल्या आक्षेपांबाबत विचारल्यानंतर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करीत मलिकांचे प्रश्न त्यनांच विचारा, असे सांगत कितीही आग्रह केला तरी या विषयावर आपण बोलणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. नो कॉमेन्टस् म्हणण्याचा आधिकार मला आहे की नाही, असा प्रश्न त्यांनी केला.
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना आयकर विभागाचे नुकतेच पडलेले छापे व जरंडेश्वर कारखान्यांच्या संदर्भाने खुलासा केला. यावेळी पत्रकारांनी ‘एनसीबी’चे आधिकारी समीर वानखेडे व मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला.त्यावर काहीसे नराज होत त्यांनी मलिक व वानखेडे यांच्याबाबतच्या प्रश्नावर मी काय उत्तर देणार मलिकांचे प्रश्न तुम्ही त्यांनाच विचार असेही सांगितले.
कारखान्यांची खरेदी-विक्री पूर्णपणे पारपर्शीपणे झाली असून त्यात कोणतेही चुकीचे काम झालेले नाही. मात्र, काही लोक २५ हजार कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाला असे मोठे आकडे सांगून लोकांची दिशाभूल व आमची बदनामी करीत आहेत.कुणी किती कारखाने घेतले त्याचा पूर्ण हिशोब आपल्याकडे आहे. आपण कुणाची नावे घेणार नाही. मात्र, आम्हला टार्गेट केले जात आहे, असे पवार यांनी सांगितले.
मी कधीच खोटे काम करीत नाही. त्यामुळे मी बेईमानी केली असे म्हणायला त्यांना काही वाटायला हवे, असे पवार यांनी उद्वग्निपणे म्हणाले. गेल्या पंधरा वर्षात ६५ कारखाने विकले किंवा चालवायला दिले.आणखी दहा कारखान्याने चालवावला देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील प्रत्येक व्यवहार नियम पाळून झाला असताना आमच्याकडे बोट ठेवण्यामागे आमची बदनामी करण्याच हेतू असल्याचा आरोप पवार यांनी केला.
Edited By : Umesh Ghongade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.