आंदोलनांपेक्षा प्रत्यक्ष काम किती कठीण; आता चाकणकरांना कळेल

चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल देसाई यांनी त्यांचे अभिनंदन करताना त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
शीतल गंभीर देसाई-रूपाली चाकणकर
शीतल गंभीर देसाई-रूपाली चाकणकर सरकारनामा

मुंबई : महिलांवरील अत्याचारांच्या घटनांनी त्रस्त झालेल्या महाराष्ट्राला आज दिल्लीतील केजरीवालांसारखी आपल्याच सरकारविरुद्ध आंदोलने नको आहेत, तर जिजाऊंचे कठोर राज्य हवे आहे. त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आंदोलनांपेक्षा महिला कल्याणावर भर द्यावा, अशा शब्दांत मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष शीतल गंभीर देसाई यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल देसाई यांनी त्यांचे अभिनंदन करताना त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. आंदोलनांमुळे तयार झालेली चाकणकर यांची आक्रमक प्रतिमा पाहता राज्यातील महिलांना त्यांच्याकडून पुष्कळ अपेक्षा आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

शीतल गंभीर देसाई-रूपाली चाकणकर
जात पडताळणी समितीकडून मनस्ताप : म्हणे कागदपत्रे पावसात भिजली;आता पुन्हा जमा करा

राज्यात मध्यंतरी महिलांवरील अत्याचाराच्या कित्येक घटना घडल्याने मोठीच खळबळ उडाली होती. भाजपा नेत्यांनी त्याविरोधात मोठे रान उठवले होते. त्यातच राज्य महिला आयोगाला बराच काळ अध्यक्ष नसल्याबद्दलही राज्य सरकारवर टीका केली जात होती. आता अध्यक्षपदावर नियुक्ती झाल्याने सरकारला उशिरा का होईना पण जाग आली, अशीही प्रतिक्रिया श्रीमती देसाई यांनी व्यक्त केली आहे.

एरवी उठसूठ प्रत्येक गोष्टीत केंद्र सरकारला जबाबदार धरून आंदोलने करणाऱ्या नवनियुक्त अध्यक्षांना आता स्वतः प्रत्यक्ष काम करणे किती कठीण असते ते कळेल. केवळ दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा स्वतः काहीतरी भरीव काम करून दाखवणे हे मोठेच आव्हान असून आता नवनियुक्त अध्यक्ष हे आव्हान कसे पेलतील याकडे राज्यातील महिला अपेक्षेने पहात आहेत. त्या अपेक्षा नव्या अध्यक्षांनी पूर्ण कराव्यात, अशा शुभेच्छाही श्रीमती देसाई यांनी दिल्या आहेत.

शीतल गंभीर देसाई-रूपाली चाकणकर
पुण्यातील ऑडिओ क्लिप ऐकून नाना पटोले, अशोक चव्हाण यांनीही डोक्याला हात लावला..

परस्परविरोधी स्वभावाच्या तीन पक्षांमधील धटिंगणांवर नव्या अध्यक्षांना नियंत्रण ठेवायचे आहे. त्यापैकी एका पक्षाच्या मंत्र्यावरच महिलेवर अत्याचार केल्याचे आरोप झाल्याने त्याची गच्छंती झाली होती. खुद्द अध्यक्षांच्याच पक्षातील काही सहकाऱ्यांवरही असेच आरोप झाले होते. सत्ताधारीच असे मस्तवाल झाल्याने सरकारी अधिकारी व गावगुंडांनाही जोर चढल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा वेळी आपला परका न पाहता अपराध्याला कठोर शासन देणाऱ्या जिजाऊचे राज्य आज हवे आहे. महिलांच्या भल्यासाठी स्वतः हाल सोसून काम करणाऱ्या सावित्रीबाईंचा आदर्श अध्यक्षांनी समोर ठेवावा, असेही श्रीमती देसाई यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com