Nana Patole News : काँग्रेस देशभरात ‘नरेंद्र मोदी जवाब दो’ आंदोलन करणार! नाना पटोलेंची पुण्यात मोठी घोषणा

Congress Vs BJP : केंद्रात २०१४ मध्ये भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून सातत्याने लोकशाहीची पायमल्ली....
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Pune News : देशात जनतेचे पैसे सुरक्षित नाहीत. शेतकऱ्यांसाठी काळे कायदे आणण्याचा प्रयत्न या सरकारने केला आहे. या सरकारनं देशाला संपवण्याचा प्रयत्न केला. भाजपच्याच एका माजी राज्यपालांनी पुलवामा घटनेची हकिगत सांगितली. यावरून मोदी सरकारच्या काळात आपले सैन्य सुद्धा सुरक्षित नाही. म्हणून आम्ही प्रश्न विचारत आहोत.

हे सरकार लोकांना खोट बोलून सत्तेत आलेले आहे. एवढे आरोप होऊनही मोदी गप्प का. संपूर्ण देशाला अपमानित करण्याचं काम मोदींनी केले आहे असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर केला आहे. याचवेळी कॉंग्रेसच्यावतीने देशभर ‘नरेंद्र मोदी जबाब दो’आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी केली.

Nana Patole
Pimpri Chinchwad News: अखेर अवैध होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी सात तासानंतर गुन्हा दाखल,पोलीस म्हणाले...

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole )यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली. पटोले म्हणाले, केंद्रात २०१४ मध्ये भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून सातत्याने लोकशाहीची पायमल्ली केली जात आहे. जनतेचे रक्षण करण्याची सरकारची जबाबदारी असताना जनतेच्याऐवजी अदानी उद्योगसमूहाला मदत सरकार मदत करत आहे. लोकांना खोटी आश्‍वासने मोदी सत्तेत आले असून, ते सातत्याने देशाला अपमानित करत आहेत. मोदी यांनी ५६ इंचांची छाती असल्याचे भासवून देशाला संपविण्याचा प्रयत्न केला आहे असंही पटोले म्हणाले.

Nana Patole
NCP-BJP Politics : 'आता लोकही आमच्याकडे संशयाने पाहायला लागलेत'; दिलीप मोहिते-पाटलांची माध्यमांना विनंती

अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मानवतेची सेवा केली. त्यांना भारतरत्न मिळायला हवा. अशा व्यक्तींचा जेव्हा सन्मान होतो, तेव्हा इतकी लोक येणं साहजिक आहे. पण इतकी जास्त लोकं येत आहेत, तेव्हा अमित शाह यांच्यासाठी एअर कंडिशन मंडप आणि सामान्य जनता कडक उन्हात कशासाठी. सामान्य जनतेच्या पैशांचा हा कार्यक्रम होता. तरीही जनतेसाठी मंडप का उभारला नाही? असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला आहे.

राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा...

महाराष्ट्रभूषण पुरस्कार वितरण समारंभात उष्माघाताने मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या मृत्यूस सरकारला जबाबदार धरावे आणि राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी जनतेची मागणी आहे. एवढेच नव्हे तर, या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com