Manoj Jarange Maratha Reservation : सुनील कावळेंच्या आत्महत्येला सरकारच जबाबदार; जरांगेंचा घणाघात

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरमधील सुनील कावळे यांनी गुरुवारी (१९ ऑक्टोबर) आत्महत्या केली.
Manoja Jarange Ptil
Manoja Jarange Ptil Sarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाज स्वस्थ बसणार नाही, २४ ऑक्टोबरपर्यंत सरकारला वेळ दिला आहे. तोपर्यंत आरक्षणाचा निर्णय घ्यावा, नाही तर त्यानंतरचे मराठा समाजाचे आंदोलन राज्य सरकारला झेपणार नाही, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यावरून राज्य सरकारला धारेवर धरले. मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरमधील सुनील कावळे यांनी गुरुवारी (१९ ऑक्टोबर) आत्महत्या केली. या आत्महत्येला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा घणाघात या वेळी मनोज जरांगे यांनी केला.

शुक्रवारपासून मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या वेळी ते पुण्यासह बारामतीचा दौरा करणार आहेत. शुक्रवारी सकाळी शिवनेरी गडाच्या पायथ्यावर मनोज जरांगे यांचे मराठा समाजाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.

Manoja Jarange Ptil
BJP v/s Shivsena Politics : शिवसेनेला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का?

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आता हे आंदोलन सामान्य मराठा समाजाने हाती घेतले आहे. त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या मुदतीत म्हणजे २४ तारखेपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा या पुढील आंदोलन हातात राहणार नाही. पुढील आंदोलनासंदर्भातील सूचना मी २२ ऑक्टोबरला देणार आहे. त्यानंतर हे आंदोलन राज्यभर शांततेच्या मार्गाने करण्यात येईल. हे आंदोलन राज्य सरकारला झेपणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

छत्रपती संभाजीनगर येथील सुनील कावळे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आत्महत्या केली. या आत्महत्येला राज्य सरकार जबाबदार असून, कावळे कुटुंबाच्या पाठीशी मराठा समाज खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबातील एक सदस्य गेल्याची भावना सर्वांची आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मदत केली जाईल. येत्या काळात सामान्य मराठा समाज आरक्षणासाठी लढणारा असून, आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यासोबतच मराठा समाजातील युवकांनी भावनिक न होता कुणीही आत्महत्येचा पर्याय निवडू नये, असे आव्हान त्यांनी केले. मराठा आरक्षण युवा पिढीसाठी घ्यायचे आहे. त्यासाठी युवा मंडळी आपला जीव गमावत असेल, तर आरक्षण कोणासाठी घ्यायचे हा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे येत्या काळात कोणीही आत्महत्यासारखा पर्याय निवडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

Edited By- Anuradha Dhawade

Manoja Jarange Ptil
Maratha Mahasangha aggressive : शिंदे फक्त ‘कुंकवाचा धनी’, पुढच्या निवडणुकीत मराठा नेत्यांना पाडणार मराठा महासंघ !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com