Maharashtra EVM Row : ‘ईव्हीएम’ विरोधात 95 वर्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याने थोपटले दंड; आत्मक्लेश उपोषणाला सुरूवात

Baba Adhav Maharashtra Assembly Election Result Mahayuti Government : निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विविध आकडेवारीच्या आधारे ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
Baba Adhav
Baba AdhavSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यानंतर सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम बाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे. या विरोधात 95 वर्षाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी आंदोलन सुरू केले आहे.

राज्यघटना आणि लोकशाहीची सध्या थट्टा सुरू असल्याची टीका करत वयाच्या 95 व्या वर्षांत पदार्पण केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव आजपासून महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण करणार आहेत. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.

Baba Adhav
Ravindra Chavan Oath Ceremony: रविंद्र चव्हाण यांनी खासदारकीची शपथ घेताच गदारोळ; काय घडलं लोकसभेत?

निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विविध आकडेवारीच्या आधारे ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. महायुतीला मिळालेल्या या मोठ्या यशामागे ईव्हीएम घोटाळा असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत आहे. या ईव्हीएम विरोधात विविध ठिकाणी आंदोलनादेखील करण्यात आली आहे. पुण्यात देखील अशाच प्रकारचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

बाबा आढाव म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे आहे. त्यावर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप न घेणे अनाकलनीय आहे. ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला असण्याची दाट शक्यता आहे. या माध्यमातून विधानसभा निवडणुकीत लोकशाहीचे वस्त्रहरण करण्यात आले आहे.

Baba Adhav
Raj Thackeray: राज ठाकरे साधणार पराभूत उमेदवारांशी संवाद; कारणं जाणून घेणार

लोकसभा निवडणुकीत निर्णय वेगळा आणि लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल वेगळा कसा लागतो हा मोठा प्रश्न या निकालानंतर निर्माण झाला आहे. ईव्हीएम आणि पैशाच्या वापरामुळे हा निकाल आला आहे, असा आरोप बाबा आढाव यांनी केला. त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेविरोधात तीन दिवस आत्मक्लेश आंदोलन करणार आहे.

केंद्र सरकारच्या विरोधात सत्याग्रह करणार असल्याचेही बाबा आढाव यांनी सांगितले. उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. अदानींच्या विरोधात लोकसभेत बोलू दिले जात नाही. हा गंभीर प्रकार असून या सरकारच्या विरोधात मी सत्याग्रह करणार असल्याचे बाबा आढाव म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com