
Pune News : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त करत असून बीड, परभणी आणि आता पुण्यात मोर्चा काढला जात आहे. समाजाने मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी लावून धरली असतानाच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील कडव्या शब्दात इशारा दिला आहे.
राज्यात संतोष देशमुख यांच्या हत्याचे पडसाद उमटत असून रविवारी (ता.५) पुण्यात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निषेध मोर्चा असणार आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबासह राजकीय नेते, मराठा समाजाचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
यापूर्वी मनोज जरांगे यांनी आपला संताप व्यक्त करताना धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांचे थेट नाव घेत धनंजय मुंडे शहाणे व्हा, अन्यथा समाज आता थांबणार नाही. ज्या मराठ्यांनी तुम्हाला आतापर्यंत साथ दिली त्यांच्यावर असा हल्ला करू नका. मराठ्यांवरच असे पलटण्याचा प्रयत्न करू नका, असा सल्ला वजा इशारा दिला आहे.
तसेच मुंडे जर मराठा समाजावर आरोप करत असतील, तर त्याला प्रतिउत्तर दिले जाईल. मोर्चे काढण्याची कोणी भाषा करत असेल तर मोर्चे आम्हीही काढू असे संकेतच जरांगे यांनी बोलताना दिले आहेत.
यावेळी मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनाही इशारा देताना, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द आतापर्यंत समाजाने मोडलेला नाही. आम्ही फक्त त्यांच्या शब्दासाठी शांत आहोत. पण या गुन्ह्यातून एक जरी आरोपी सुटला, तर मराठ्यांना मुख्यमंत्र्यांनी धोका दिला असा संदेश समाजात जाईल. यामुळे मुख्यमंत्री साहेब आता आवरा, मुंडे यांच्या मागे न राहता आपण राज्यातील जनता आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचे सिद्ध करा, असे देखील आवाहन जरांगे यांनी केले आहे.
संतोष देशमुख यांचा खून आमच्या जिव्हारी लागला असून या हत्येतून जातीय तेढ निर्माण केला जात असल्याचा दावा यावेळी जरांगे यांनी केला आहे. तसेच संतोष देशमुख यांचे मारेकरी पुण्यात कसे सापडले असा सवाल करताना आरोपी थेट पुण्यात का आणि कसे आले? याचा योग्य प्रकारे तपास व्हावा, दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.
त्याचबरोबर जरांगे यांनी सरकारने तातडीने तपास करून आरोपींनी शिक्षा नाही दिल्यास मराठा समाज राज्यभर उग्र आंदोलनाचे लोन उभारेल असाही इशारा यावेळी मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.