Sunil Shelke News : पवना बंद जलवाहिनी प्रकरण : कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी भाजपचे भेगडे अन् राष्ट्रवादीचे शेळके आले एकत्र

PCMC News : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पवना जलवाहिनी प्रकल्पाला दिलेली स्थगिती बारा वर्षानंतर राज्य सरकारने नुकतीच उठवली.
Sunil Shelke, Bala Bhegde News
Sunil Shelke, Bala Bhegde NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad News : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पवना जलवाहिनी प्रकल्पाला दिलेली स्थगिती बारा वर्षानंतर राज्य सरकारने नुकतीच उठवली. तिचे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये स्वागत होत असताना दुसरीकडे मावळ तालुक्यातून, मात्र कडाडून विरोध सुरू झाला आहे. दरम्यान, ही स्थगिती उठवताना स्थानिक लोकप्रतिनिधींनाही विश्वासात न घेतल्याबद्दल राज्यातील सत्तेत नव्याने सामील झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाचे स्थानिक आमदार मावळचे सुनील शेळके यांनी नाराजी व्यक्त केली. ती करताना त्यांनी या प्रकल्पाला पहिल्यापासून ठाम विरोध असलेले कट्टर राजकीय विरोधक भाजपचे मावळचे माजी आमदार बाळा भेगडेंच्या (Bala Bhegade) शेतकऱ्यांबरोबर राहण्याच्या सूरात सूरही मिसळला.

सत्तेत असूनही विरोधाचा सूर आळवल्याबद्दल विचारणा केली असता भुमीपूत्रांवर अन्याय होत असेल, तर सत्तेचे शुभ, अशुभ नाही, असे बाणेदार उत्तर शेळकेंनी (Sunil Shelke) दिले. या प्रकल्पाला विरोध नाही, पण आम्हाला अंधारात ठेवून, स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणी काही करू शकत नाही, असे आव्हान त्यांनी दिले. तसेच तो करणार असाल, तर लढा उभारू, असा इशाराही दिला. याप्रश्नी स्थानिक शेतकरीच नाही, तर सर्व राजकीय पक्षांना एकत्र येऊन निर्णय घेतला पाहिजे, अशी भूमिका मांडत त्यांनी स्थगिती उठवण्याच्या आपल्याच सरकारच्या निर्णयाला अप्रत्यक्ष विरोध केला.

Sunil Shelke, Bala Bhegde News
Maratha Reservation News: मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी तापणार ? आंदोलकांनी आता आपला मोर्चा आमदार-खासदारांकडे वळवला

ही बंदी अजितदादांमुळे उठली असा दावा त्यांच्या गटाचे पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकारी करीत असताना त्यांचेच कट्टर समर्थक शेळकेंनी त्यावर ही प्रतिक्रिया दिल्याने ती चर्चेची ठरली. याप्रश्नी राजकारण करायचे नसल्याचे स्पष्ट करीत त्यावर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आमदार शेळकेंनी प्रतिपादित केली. तसेच या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनावर ९ ऑगस्ट २०११ च्या गोळीबाराच्या जखमेवर ही बंदी उठवून कोणी मीठ चोळत आहे, याचा शोध घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.

त्यातील जखमी शेतकऱ्यांचे अद्याप पुनर्वसन झाले नसून ते झाले पाहिजे, असेही ते म्हणाले. स्थानिक शेतकऱ्यांचा विषय होताना काहींचा वेगळा डाव आणि हट्ट असेल, ते वेगळी भूमिका घेत असतील, तर त्यावर मार्ग काढावा लागेल, असा सज्जड दमही त्यांनी भरला. शेतकरी सांगतील,तेच मी ऐकणार आणि करणार, हे त्यांनी स्पष्ट केले.

आताच्या महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीच असताना २००८ मध्ये हा प्रकल्पाचे भुमीपूजन केले होते. मात्र, त्याच्या विरोधातील स्थानिकांच्या रास्ता रोको आंदोलनावर ९ ऑगस्ट २०११ रोजी पोलिसांनी गोळीबार केला. त्यात तिघांचा बळी जाऊन सातजण जखमी झाले. त्यामुळे आघाडी सरकारनेच या प्रकल्पाला २०११ लाच स्थगिती दिली होती. आता ती उठविण्यात आली. परंतू, ती पुन्हा वादात सापडली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Sunil Shelke, Bala Bhegde News
Satara News : जमावबंदी आदेशामुळे पोलिसांनी मूक मोर्चा रोखला; आंदोलकांवर केली कारवाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com