

Prakash Ambedkar : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अटक वाॅरंट जारी करण्यात यावे, अशी मागणी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांच्या वकिलाने पत्राद्वारे केली आहे. कोरेगाव भीमा आयोगासमोर उद्धव ठाकरे किंवा त्यांचा प्रतिनिधी हजर राहिला नाही, त्यामुळे त्यांच्यावर करावाई करण्यासाठी अटक वाॅरंट जारी करण्याची मागणी करण्यात आली.
कोरेगाव भीमा दंगलीच्या संदर्भात शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या पत्राची प्रत आयोगाकडून पवार यांच्याकडे मागण्यात आली होती. मात्र, ती प्रत आपल्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनी ती प्रत द्यावी, यासाठी त्यांना नोटीस देण्यात आली होती. मात्र, ठाकरेंकडून या नोटीसीला उत्तर देण्यात आले नाही.
त्यामुळे आयोगाच्या नोटीसनंतर देखील ठाकरे किंवा त्याचा प्रतिनिधी हजर राहिला नसल्याने त्यांचा विरोधात अटक वाॅरंट जारी करण्यात यावे, अशी मागणी पत्राद्वारे आंबेडकरांच्या वकिलाने केली आहे.
मंगळवारी (ता.2) कोरेगाव भीमा आयोगापुढे सुनावणी झाली. या सुनावणी वेळी ठाकरेंच्या वतीने कोणतेही निवेदन अथवा कागदपत्र सादर करण्यात आली नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचे वकील अॅड किरण कदम यांनी आयोगाकडे ठाकरेंच्या विरोधात अटक वाॅरंट जारी करण्यासंदर्भात अर्ज केला. आयोगाने या अर्जवर अद्याप निर्णय घेतला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.