
Pune News : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. या चर्चांवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी भाष्य करत स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले, “दोन ठाकरे एकत्र आले तर आमचं पोट दुखायचं काही कारण नाही. जुनी एक म्हण आहे – ‘मुंबईत पाहिजे तर ठाकरे पाहिजे’. कुठल्याही पक्षाचा असला, तरी प्रत्येकाचं मत हेच असायचं की मुंबईत ठाकरेच पाहिजे, पण ते कशासाठी म्हणायचे, हे मात्र माहित नाही.”
ते पुढे म्हणाले, “दोन भावांनी एकत्र यावं, लोकांचीही तशी इच्छा आहे. वेगळे लढले तर पडतात, मग एकत्र येऊन पडू द्या. लोकांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी एकत्र यायला हरकत नाही. आमचा काही फायदा होणार नाही, पण लोकांची इच्छा आहे तर एकदा होऊन जाऊ द्या.” असं जरांगे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दोन गटांच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चांवरही जरांगेंनी बोचरी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “दोन राष्ट्रवादी वेगळ्या कधी होत्याच नाहीत. आता एकत्र येण्याचं नाटक लोकांना दाखवायला आहे. राजकारणात असे छक्केपंजे नेहमीच चालतात.”
हिंदी भाषा आणि गुजरातबाबतच्या भूमिकेवरून राज ठाकरे सध्या आक्रमक आहेत. यावर बोलताना जरांगे म्हणाले, “राज ठाकरे आज गुजरातवर बोलत आहेत, पण पूर्वी त्यांनीच गुजरातचा प्रचार केला होता. आता विरोध करत आहेत, तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी सभाही घेतल्या होत्या, हे लक्षात ठेवायला हवं.”
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.