स्वाभीमानी आक्रमक : व्याजासह ‘एफआरपी’ न दिल्यास कारखाने बंद पाडू

काही कारखाने शेतकऱ्यांकडून उसाची नोंद असल्याचे सांगून तुकड्यात ‘एफआरपी’ घेण्याबाबत करार करून घेत आहेत.
राजू शेट्टी
राजू शेट्टी सरकारनामा
Published on
Updated on

अनिल सावळे : सरकारनामा ब्यूरो

पुणे : ‘‘ नुकत्याच सुरू झालेल्या गाळप हंगामात राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी ‘एफआरपी’ देण्यात यावी. तसेच, यापूर्वीची थकीत ‘एफआरपी’ व्याजासहित न दिल्यास कारखाने बंद पाडू,’’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज पुण्यात दिला.

जयसिंगपूरमध्ये नुकत्याच झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत एकरकमी ‘एफआरपी’सह विविध मागण्यांबाबत ठराव मांडण्यात आले. शेट्टी यांनी या ठरावांची प्रत शुक्रवारी (ता. २२) साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना आज दिली. गेल्या हंगामातील थकीत ‘एफआरपी’ची रक्कम १५ टक्के व्याजासहित न दिल्यास गाळप परवाने देऊ नयेत. ‘एफआरपी’ थकीत ठेवणारे कारखाने आम्ही कायदा हातात घेऊन बंद पाडू, असा इशारा शेट्टी यांनी या वेळी दिला.

राजू शेट्टी
किरीट सोमय्या यांची नवाब मलिक यांना धमकी

काही कारखाने शेतकऱ्यांकडून उसाची नोंद असल्याचे सांगून तुकड्यात ‘एफआरपी’ घेण्याबाबत करार करून घेत आहेत, ही बाब चुकीची आहे. त्याबाबत साखर आयुक्तांनी सुनावणी घेण्याचे आश्वासन दिले. ‘‘साखर कारखाने काटामारी करून शेतकऱ्यांना लुटत आहेत. काटामारी केलेल्या उसाची नोंद बगलबच्च्यांच्या नावावर वजनपावती करून केली जाते. हा ऊस मालक तोड व खुद्द वाहतूक म्हणून दाखविला जातो. त्यामुळे स्वतः तोडणी वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी कारखान्याने सूचना फलकावर लावून त्याची प्रत साखर आयुक्तालयाला पाठवावी, अशी मागणी त्यांनी केली. आयुक्तालयाकडून या मागण्यांचा अभ्यास केला जाईल. शेतकरी आणि कारखान्यांच्या हितासंदर्भात असलेले मुद्दे राज्य सरकारला कळविण्यात येतील, असे आश्‍वासन साखर आयुक्तांनी दिल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

राजू शेट्टी
ठाकरे सरकारचे मंत्री ड्रग्स माफियांचे प्रवक्ते झाले का ?

साखर आयुक्तांकडे केलेल्या मागण्या

- शेतकऱ्यांना विनाकपात एकरकमी एफआरपी द्यावी

- उसाला चालू हंगामात ३३०० रुपये उचल द्यावी

- साखरेचा किमान विक्रीदर ३७ रुपये प्रतिकिलो करावा

- नाबार्डने चार टक्के व्याजदराने साखर कारखान्यांना कर्ज द्यावे

- गोपीनाथ मुंडे महामंडळामार्फत ऊसतोडणी मजुरांसाठी पेन्शनसह सुविधा सुरू कराव्यात

- इथेनॉल विक्रीचे लाभ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी

- इथेनॉल खरेदीदरात प्रतिलिटर दहा रुपये वाढ करावी

- कारखान्यांना बजावलेल्या प्राप्तीकर नोटिसा मागे घ्याव्यात

- एफआरपी थकीत असलेल्या कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये

- स्वतः ऊसतोड, वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी कारखान्यांनी जाहीर करावी

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com