

Uddhav Thackeray News : कोरेगाव भीमा आयोगाच्या समोर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हजर झाले नाहीत. तसेच त्यांचा प्रतिनिधी देखील आला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या वकिलाने ठाकरेंच्या विरुद्ध अटक वाॅरंट जारी करण्याचे पत्र आयोगाला दिले होते. त्यामुळे ठाकरेंना अटक होणार का? त्यांच्या विरोधात अटक वाॅरंट जारी होणार का? अशी चर्चा सुरू झाली होती.
मंगळवारी प्रकाश आंबेडकर यांच्या वकिलाने मागणीचे पत्र आयोगाकडे देताच उद्धव ठाकरेंचे वकील अॅड.असीम सरोदे हे तातडीने बुधवारी आयोगासमोर गेले. त्यांनी ठाकरेंचे वकीलपत्र घेतले. ते म्हणाले, आम्ही वकीलपत्र दाखल केले आहे. त्यामुळे जी मागणी होती अटक वाॅरंट काढण्याची ती आपोआप रद्द झाली आहे.
अॅड. सरोदे यांनी सांगितले की, 'कोरेगाव भीमा आयोगासमोर उद्धव ठाकरे यांच्यातर्फे आम्ही वकिलपत्र दाखल केले आहे. आयोगाचे पुढचे कामकाज हे 7 ते 10 जानेवारी तारखांमध्ये होणार आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना कोरेगाव भिमा विषयी झालेल्या पत्रव्यवहाराबाबत काय माहिती आहे, त्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे.'
सरोदे यांनी सांगितले की, कोरेगाव भिमा संदर्भात शरद पवारांनी पत्र पाठवले होते. जे पत्र पाठवलं होतं त्या पत्रात नेमकं काय आहे? त्या पत्रावर काय कारवाई झाली? यासंदर्भात माहिती प्रकाश आंबेडकर यांनी मागवली आहे. उद्धव ठाकरेंचे जे म्हणणं असेल ते आम्ही आठ जानेवारीला दाखल करू, असे देखील सरोदे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.