Sakal-Saam Survey On Election : लोकसभा अन् विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्या तर मतदार घेणार 'हा' निर्णय !

Loksabha And Vidhansabha Election : राज्यात भाजप सत्तेत यावे असे तब्बल ६५ टक्के मतदारांनी वाटते
Mahayuti
MahayutiSarkarnama
Published on
Updated on

Election And Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट राज्य सरकारमध्ये सहभागी झाला. यानंतर राज्याच्या राजकीय घडामोंडींना अनपेक्षितपणे मोठे वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर 'सकाळ-साम'ने राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीबाबत सर्वेक्षण केले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर राज्यातील बदलत्या राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या तर मतदार कुणावर पसंती देणार, याबाबतही कल जाणून घेतला आहे. (Latest Political News)

Mahayuti
Sakal-Saam Survey : मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना सर्वाधिक पसंती;पण उद्धव ठाकरेंना मोठी सहानुभूती, दुसऱ्या स्थानावर झेप

'सकाळ-साम'ने केलेल्या सर्वेक्षणात ७४ हजार ३३० मतदारांची भूमिका जाणून घेतली आहे. यात विविध पक्षांना मतदान करणाऱ्या विविध वयोगटातील मतदारांचा सहभाग आहे. तसेच ५० टक्के महिलांसह सर्व जाती-धर्मांच्या लोकांचाही समावेश केला आहे. यासह विविध व्यवसाय, नोकरी करणाऱ्या आणि आर्थिक स्थितीचाही विचार करण्यात आला आहे. या सर्वेक्षणासाठी सकाळ संस्थेतील राज्यातील कर्मचाऱ्यांनी फिल्डवर जाऊन लोकांकडून राज्यातील राजकीय स्थितीबाबत उपस्थित झालेल्या विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली आहेत.

Mahayuti
Sakal -Saam Survey : निवडणुकीनंतर पक्षांतर करणाऱ्या आमदारांबद्दल आपले मत काय? मतदारांच्या उत्तराने अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढणार

देशात २०२४ मध्ये लोकसभा तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दोन्ही निवडणुका एकत्र होण्याची चर्चा वारंवार होत आहे. याचाही विचार या सर्वेक्षणात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणातून मतदारांना दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या तर आपण एकाच पक्षाला मतदान करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला सहभागी मतदारांपैकी तब्बल ४६.९ टक्के मतदारांनी होकारार्थी उत्तर दिले आहे. तर २७.३ टक्के मतदारांनी आम्ही दोन्ही निवडणुकांसाठी एकाच पक्षाला मतदान करणार नाही, असे सांगितले. तसेच २४.८ टक्के मतदारांनी काही सांगता येत नाही, असे उत्तर दिले आहे.

Mahayuti
Sakal-Saam Survey On NCP : अजित पवार गटाचे धाबे दणाणले; काय सांगतो 'सकाळ-साम' सर्व्हे ?

या प्रश्नाला जोडूनच भाजप सत्तेत यावा असे वाटते का, याबाबत सर्वेक्षणात मतदारांचा कल जाणून घेतला आहे. या प्रश्नावर तब्बल ६५ टक्के मतदारांनी भाजप सत्तेत यावे असे उत्तर दिले आहे. १६ टक्के मतदारांना भाजप पुन्हा सत्तेत नको, असे उत्तर दिले आहे. तर १९ टक्के लोकांनी या प्रश्नावर काहीही सांगता येत नाही, असे उत्तर देणे पसंत केले आहे. यामुळे राज्यात भाजपच्या एकहाती सत्ता येण्यास मतदार अनुकूल असल्याचे दिसून येत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com