Sakal-Saam Survey : महाराष्ट्रात 600 गाड्यांच्या ताफ्यासह एन्ट्री केलेल्या 'बीआरएस'ची काय आहे स्थिती? 'सकाळ-साम' सर्व्हेमध्ये मतदार म्हणतात

BRS News : राज्यामध्ये घडलेल्या सत्तानाट्यानंतर राज्यातील मतदारांचा कल 'सकाळ-साम'ने महासर्व्हेच्या माध्यमातून जाणून घेतला आहे.
BRS, KCR
BRS, KCRSarkarnama

Sakal -Saam Ncp Survey : राज्यामध्ये घडलेल्या सत्तानाट्यानंतर राज्यातील मतदारांचा कल 'सकाळ-साम'ने महासर्व्हेच्या माध्यमातून जाणून घेतला आहे. विशेष, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर 'सकाळ-साम'ने सर्व्हे केला आहे.

'सकाळ-साम'ने केलेल्या महासर्व्हेमध्ये राज्यभरातील 74 हजार 330 मतदारांची भूमिका जाणून घेतली आहे. यात विविध पक्षांना मतदान करणाऱ्या विविध वयोगटातील मतदारांचा सहभाग आहे. तसेच ५० टक्के महिलांसह सर्व जाती-धर्मांच्या मतदारांचाही समावेश आहे. यासह विविध व्यवसाय, नोकरी करणाऱ्या आणि आर्थिक स्थितीचाही विचार करण्यात आला आहे.

BRS, KCR
Sakal -Saam Survey : निवडणुकीनंतर पक्षांतर करणाऱ्या आमदारांबद्दल आपले मत काय? मतदारांच्या उत्तराने अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढणार

या सर्वेक्षणासाठी सकाळ संस्थेतील राज्यातील कर्मचाऱ्यांनी फिल्डवर जाऊन लोकांकडून राज्यातील राजकीय स्थितीबाबत उपस्थित झालेल्या विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली आहेत. या या महासर्व्हेक्षणामध्ये मतदारांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्या माध्यमातून राज्यातील सध्याची परिस्थिती समोर आली आहेत.

असा प्रश्न सर्व्हेमध्ये विचारण्यात आला होता. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत (2024) मतदान करताना आपण पुढीलपैकी कोणत्या पक्षाची निवड कराल? यामध्ये मतदारांनी भाजपाला सर्वाधिक कल दिला आहे. भाजप, (BJP) 26.8 टक्के, काँग्रेस 19.1 टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार 14.9 टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)- अजित पवार, 5.7 टक्के, एकनाथ शिंदे 4.9 टक्के, शिवसेना (Shivsena), उद्धव ठाकरे 12.7 टक्के, मनसे २.४ टक्के, वंचित २.८ टक्के, एआयएमआयएम 0.4 टक्के, स्वाभिमानी 0.3 टक्के, प्रहार 0.3 टक्के, बविआ 0.6 टक्के, केसीआर 0.8 टक्के, आप 0.7 टक्के, अपक्ष 1 टक्के आणि इतर 5.5 टक्के असा कल मतदारांनी दिला आहे.

BRS, KCR
Sakal-Saam Survey : मूळ पक्षात वेगळा गट करुन सत्तेत सहभागी होण्याचा नवीन फंडा मान्य आहे का? मतदारांच्या उत्तराने आमदारांचे टेन्शन वाढले!

दरम्यान, या सर्व्हेमध्ये दुसरा प्रश्न विचारण्यात आला होता की, निवडणुकीनंतर पक्षांतर करणाऱ्या आमदारांबद्दल आपले मत? यावर मतदार म्हणाले, आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी असे 38.7 टक्के मतदारांनी म्हटले आहे. तर 13.3 टक्के मतदारांना नेत्यांची राजकीय अपरिहार्यता मान्य आहे. 30.1 टक्के मतदारांनी सांगितले की आमदारांना कायमस्वरुपी निवडणुक लढविण्यावर बंदी आणावी, तर यापैकी नाही, असे 18 टक्के मतदारांनी म्हटले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com