Sharad Pawar Reaction : अजितदादांच्या बंडानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; ‘पंतप्रधानांनी दोन दिवसांपूर्वी जो आरोप केला होता...’

सर्व आरोपांतून पक्षाला आणि ज्यांच्याबाबत आरोप केले होते, त्या सगळ्यांना त्यांनी मुक्त केले, त्याबद्दल मी पंतप्रधानांचा आभारी आहे.
Sharad Pawar_Ajit Pawar
Sharad Pawar_Ajit PawarSarkarnama

Maharashtra Politic's : देशाच्या पंतप्रधानांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित विधान केलं होतं. त्यात दोन गोष्टींचा उल्लेख केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे. ते सांगताना राज्य सहकारी बॅंक आणि सिंचन संदर्भातील जी तक्रार होती, त्याचा उल्लेख केला होता. त्यात राष्ट्रवादी पक्ष सहभागी आहे, असाही आरोप केला होता. मला आनंद आहे की आज राष्ट्रवादीच्या काही सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात शपथ दिली. याचा अर्थ त्यांनी केलेले सर्व आरोप हे वास्तव नव्हते. सर्व आरोपांतून पक्षाला आणि ज्यांच्याबाबत आरोप केले होते, त्या सगळ्यांना त्यांनी मुक्त केले, त्याबद्दल मी पंतप्रधानांचा आभारी आहे. (Sharad Pawar's first reaction after Ajit pawar's Reaction)

अजित पवार यांनी आज दुपारी उमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर शरद पवार बोलत होते.

आमच्यातील काही सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. येत्या सहा तारखेला महाराष्ट्रातील पक्षाच्या प्रमुख लोकांची बैठक बोलावली होती. संघटनात्मक बदलाच्या संदर्भातील काही प्रश्न उपस्थित केले होते. त्याचा विचार करणार होतो. प्रश्न उपस्थित केलेल्या सहकाऱ्यांनी पक्षापेक्षा वेगळी भमिका घेतली आहे. त्यांनी आम्हीच पक्ष आहोत, ही भूमिका मंडली.

विधीमंडळाचे सदस्य कितीपत वेगळी भूमिका घेतली, याचे चित्र हे येत्या दोन तीन दिवसांत लोकांसमोर येईल. कारण ज्यांची नावे त्यात आहेत. त्यातील काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधून आम्हाला त्या ठिकाणी निमंत्रित केलं. आमच्या सह्या घेतल्या. पण, आमची भूमिका वेगळी आहे, ती कायम आहे. त्यावर आम्ही आताच काही बोलणार नाही. पण त्यांनी जे माझ्यासमोर मांडलं, तेच जनतसमोर मांडलं पाहिजे, तर माझा ज्यावर विश्वास बसेल. मांडलं नाही तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली, असे मी मानेन.

पक्षाचे भवितव्याबाबत हा प्रकार मला नवीन नाही. १९८० मध्ये ज्या पक्षाचे नेतृत्व करत होाते. त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते. त्यातील सहा सोडता सर्व जण आम्हाला सोडून निघून गेले होते. निवडणुकीनंतर मी ५८ चा नेतो, पण पक्षफुटीनंतर मी पाचच लोकांचा नेता राहिला होतो. त्या पाच लोकांना बरोबर घेऊन पक्ष बांधणीसाठी महराष्ट्रात फिरलो. त्यानंतर निवडुणकीत आमची संख्या ६९ वर गेली. पक्ष सोडून गेले, त्यातील ३ ते ४ वगळता सर्व निवडणुकीत पडले होते, असेही पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com