काँग्रेसची धुळधाण; राणे ते नाईक...17 आमदारांचा आकडा आला तीनवर

भाजपने काँग्रेसला अनेक धक्के देत खिळखिळे केले आहे.
Congress
Congress Sarkaranama

पणजी : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी मंगळवारी आमदारकीचा राजीनामा दिला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याची शक्यता आहे. मागील विधानसभा निवडणुकीनंतर हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास गेला अन् काँग्रेसची (Congress) धुळधाण उडण्यास सुरूवात झाली. विश्वजित राणे (Vishwajeet Rane) ते रवी नाईक (Ravi Naik) या प्रवासात पाच वर्षांत काँग्रेसचे चौदा आमदार फुटले आहेत.

पुढील वर्षी गोव्यात विधानसभेची निवडणूक (Goa Assembly Election) होत आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसनंही जोर लावला असला तरी प्रत्यक्षात मागील निवडणुकीएवढी ताकद आता राहिलेली दिसत नाही. मागील निवडणुकीत काँग्रेसला 40 पैकी 17 जागा मिळाल्या होत्या. सर्वाधिक आमदार काँग्रेसचे होते. पण त्रिशंकु स्थितीमध्ये काँग्रेसला चकवा देत भाजपने सत्ता हस्तगत केली. हीच काँग्रेसची धुळधाण उडण्याची सुरूवात होती.

Congress
स्वत:ला बदला, नाहीतर...! पंतप्रधान मोदींचा 'त्या' खासदारांना सूचक इशारा

भाजपला या निवडणुकीत 13 जागा मिळाल्या होत्या. आता हा आकडा वाढला आहे. 2017 च्या निवडणुकीनंतर विश्वजित राणे यांनी काँग्रेसला पहिला धक्का दिला. आमदारकीचा राजीनामा देत ते भाजपमध्ये दाखल झाले. पोटनिवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. सध्या ते आरोग्य मंत्री आहेत. त्यानंतर काही दिवसांत सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.

दोघांनी मे 2019 मध्ये पोटनिवडणुकीतही विजय मिळवला. काँग्रेसला सर्वात मोठा धक्का तत्कालीन विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी दिला. जुलै 2019 मध्ये कवळेकर यांनी त्यांच्यासह 10 आमदारांचा गट काँग्रेसमधून बाहेर पडला. कवळेकर हे सध्या गोव्याचे उपमुख्यमंत्री आहेत. एवढे आमदार फुटल्याने काँग्रेसमध्ये सध्या तीनच आमदार उरले आहेत. त्यामध्ये विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, अलेक्सिओ रेजिनाल्डो आणि प्रतापसिंग राणे यांचा समावेश आहे.

Congress
गावकऱ्यांच्या हत्येचा बदला घेणार; नागा आर्मीने लष्कराला दिला निर्वाणीचा इशारा

काँग्रेसचे आमदार फोडल्याने भाजपची ताकद वाढली आहे. असे असले तरी काँग्रेससोबत गोवा फॉरवर्ड पक्षाने युती केली आहे. तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने तृणमूल काँग्रेसशी आघाडी केली आहे. हे दोन्ही स्थानिक पक्ष पुर्वी भाजपसोबत होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला स्वबळावर निवडणूक लढवावी लागणार आहे. आपनेही राज्याच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही निवडणुकीत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये खरा कस काँग्रेसचा लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com