केंद्रीय मंत्री अन् खासदाराच्या मतदारसंघातच भाजपचा धुव्वा

खासदारकी वाचवण्यासाठी केंद्रीय मंत्री व एका खासदाराने आमदारकीचा राजीनामा दिला होता.
BJP
BJPsarkarnama

कोलकाता : पश्चिम बंगालमधील (West Bengal) चार विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Bypoll Election) तृणमूल काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवला आहे. चारही जागांवर तृणमूलच्या उमेदवारांना भरघोस मतं मिळाली असून भाजपला मोठा धक्का बसला आहे. यातील दोन जागा मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने जिंकल्या होत्या. खासदारकी वाचवण्यासाठी केंद्रीय मंत्री व एका खासदाराने आमदारकीचा राजीनामा दिला होता.

बंगालमधील दिनहाटा, शांतीपूर, खरदा आणि गोसाबा या मतदारसंघात 30 ऑक्टोबर रोजी मतदान झाले आहे. मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीत तृणमूलने भाजपचा पराभव करत राज्यात सत्ता मिळवली. या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला होता. पण भवानीपूर पोटनिवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यानंतर काही दिवसांतच चार मतदारसंघात मतदान झाले.

BJP
देवेंद्रजी, पंधरा कोटींच्या 'त्या' पार्ट्यांचा आयोजक कोण? मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट

दिनहाटा मतदारसंघात तृणमूलचे नेते उदयन गुहा यांचा तब्बल 1 लाख 60 हजार मताधिक्याने विजय झाला आहे. या मतदारसंघातून एप्रिमलमध्ये झालेल्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री निसिथ प्रमाणिक यांनी विजय मिळवला होता. पण त्यावेळी ते खासदारही होते. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर काही दिवसांत त्याच्या गळ्यात केंद्रीय मंत्रीपदाची माळ पडली. ते या मंत्रीमंडळातील सर्वात तरूण मंत्री आहेत. आता त्यांच्यात मतदारसंघात भाजपचा दारूण पराभव झाला आहे.

गोसाबा विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. सुब्रत मंडल यांनी तब्बल 1 लाख 40 हजार मतांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यांना एकूण मतदानाच्या 87 टक्के एवढी मते मिळाली आहेत. खरदा मतदारसंघात कृषी मंत्री शोभनदेब चट्टोपाध्याय यांनी भाजपच्या उमेदवाराचा 93 हजार मतांनी पराभव केला आहे. चट्टोपाध्याय हे आधी भवानीपूर मतदारसंघातून निवडूण आले होते. पण त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही जागा सोडली. त्यांना खरदा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती.

गोसाबा व खरदा मतदारसंघात तृणमूलच्या आमदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली. भाजपचे खासदार जगन्नाथ सरकार यांनाही मोठा धक्का बसला आहे. एप्रिल महिन्यातील निवडणुकीत शांतीपूर मतदारसंघातून ते विजयी झाले होते. पण खासदारकी वाचवण्यासाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत तृणमूलचे उमेदवार ब्रिजकिशोर गोस्वामी यांनी भाजपचा 64 हजार मतांनी पराभव केला. चारही मतदारसंघात विजय मिळाल्याने तृणमूलच्या आमदारांची संख्या वाढली आहे. तर भाजपची संख्या दोनने कमी झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com