राहुल क्षीरसागर
Eknath Shinde News : 'घराचा उंबरठा ओलांडत नव्हते, ते आता हंबरडा मोर्चा काढत आहेत. सत्ता गेली तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हाही हंबरडा फोडला, आता पुन्हा हंबरडा मोर्चा काढत आहेत. हे निव्वळ पुतण्या-मावशीचे प्रेम आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण केले जात असून आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खऱ्या अर्थाने काम केले. आम्ही स्वतः प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जावून तेथील परिस्थिती पहिली, असे देखील शिंदे म्हणाले.
'आम्ही शेतकऱ्यांच्या डोळ्यातील वेदना पहिल्या आणि ठरवले की त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे. म्हणूनच आम्ही ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आणि दहा हजार रुपयांची तात्काळ मदत त्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे. आम्ही आधीच सांगितले होते की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. त्या आश्वासनाची पूर्तता होत आहे.', असे देखील त्यांनी सांगितले.
'ज्या शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली, त्यांना ४७ हजार रुपये प्रति हेक्टर नुकसानभरपाई आणि मनरेगा योजनेंतर्गत ३ लाख रुपये प्रति हेक्टर अतिरिक्त सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचं भरपाई पॅकेज राज्याच्या इतिहासात प्रथमच देण्यात आली. काही जण शेतकऱ्यांच्या बांधावर जातात पण, त्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या डोळ्यातले अश्रू पाहून तरी एक बिस्किट दिलं का?', असा सवाल देखील त्यांनी केली.
आम्ही मदत किट पाठवले. शेतकऱ्यांचा दसरा आनंदात गेला, आता दिवाळीही आनंदाची होईल याची काळजी घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देखील राज्य सरकारला पूर्ण पाठिंबा दिला असल्याचे देखील शिंदे यांनी या वेळी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.