Anand Paranjpe, Vijay Shivtare, Eknath Shinde sarkarnama
ठाणे

Thane News : शिवतारेंच्या टीकेवरून परांजपे भडकले; म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी वाचाळवीर शिवतारेला समजवावे, अन्यथा...

Umesh Bambare-Patil

Thane News : शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी काल खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. या टीकेला आज आनंद परांजपे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी या वाचाळवीर शिवराळ शिवतारेला समजवावे. आमच्या शक्तिस्थळवर शिवसेनेचे वाचाळवीर नेते आघात करत असतील तर स्वाभिमानी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्याला चोख प्रत्युत्तर देईल. आणि आगामी निवडणुकीत कल्याण लोकसभेत वेगळं चित्र दिसेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

आनंद परांजपे म्हणाले, काल शिवसेनेचे शिवराळ नेते शिवतारे यांनी अजितदादांबद्दल अत्यंत चुकीची प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे, त्यांनी आपल्या नेत्यांना अवरावे. अन्यथा, आम्हीदेखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे खूप सोपे आहे, तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निकाल कल्याण लोकसभेवर लावू शकतो.

जिल्ह्यातील महायुतीचे चांगले वातावरण राहावं असं जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतारेला समजवावे. आमच्या शक्तिस्थळावर कोणी घाला घालत असेल तर आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ. परांजपे म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा मतदारसंघात मोठ्या मतधिक्याने विजय झाला होता.

बारामती लोकसभा मतदारसंघ सातत्याने विकासकामांसाठी राष्ट्रवादीकडे राहिलेला आहे. शिवतारे वैयक्तिक अजेंडा चालवत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य ती समज दिली पाहिजे. आम्हीसुद्धा असे अनेक मतदारसंघ आहेत जेथे राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते वातावरण गढूळ करू शकताे. बारामतीतून कोण निवडुन येईल, या प्रश्नावर आनंद परांजपे (Anand Paranjpe) म्हणाले, राष्ट्रवादीचे घड्याळ हेच बारामतीतून निवडून येईल, हा आत्मविश्वास आम्हाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सर्व उमेदवार घड्याळ चिन्हावरच लढतील...

इंडिया आघाडीवर परांजपे म्हणाले, सध्या इंडिया आघाडीची बैठक होतेय ही चांगली गोष्ट आहे. ठाण्यातील तीनही लोकसभेवर कोण उमेदवार देतात हा त्यांचा प्रश्न आहे. पण, आम्हाला विश्वास आहे, तीनही जागांवर महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल.

जागावाटपाच्या प्रश्नावर आनंद परांजपे म्हणाले, जागावाटपाचा तिढा लवकरच सुटेल, प्रत्येक पक्षाला सन्मानपूर्वक जागा मिळून महायुतीचा फॉर्म्युला येईल, काळजी करण्याचे कारण नाही. राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार घड्याळ चिन्हावरच लढतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. महायुतीचे उमेदवार ठाणे, कल्याण, भिवंडी मतदारसंघांतून विक्रमी मतधिक्याने निवडून आले पाहिजेत यासाठी प्रयत्न होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT