Ahmedabad News : गुजरातमधील अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुदैवाने 1 प्रवासी बचावला आहे. तर या घटनेत आत्तापर्यंत एकूण 265 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी घटनेनं देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याचदरम्यान,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळी भेट देत अपघाताची माहिती घेतली. तसेच जखमींच्या तब्येतीविषयीची रुग्णालयात जाऊन चौकशी केली. यानंतर अमित शाह (Amit Shah) यांनी मोठं विधान केलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी(ता.12)अहमदाबाद विमानतळावरुन लंडनकडे उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेनंतर घटनास्थळाला भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अपघाताविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
अमित शाह म्हणाले,अपघातानंतर 10 मिनिटात भारत सरकारला माहिती मिळाली.तातडीनं मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहविभागाचे नियंत्रण कक्ष, नागरी उड्डाणमंत्री, नागरी उड्डाण विभाग या सर्वांसोबत चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही तात्काळ फोन आला होता. भारत सरकार, गुजरात सरकार आणि सर्व विभाग मदत कार्य आणि बचाव कार्य सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं.
अहमदाबाद विमान अपघाताच्या (Ahmedabad Air Plane Crash) घटनेनंतर तातडीनं सरकारनं तातडीनं आरोग्य विभाग,फायर ब्रिगेड, पोलीस विभाग असो भारत सरकारच्या सीएपीएफला संपर्क करत आपत्ती व्यवस्थापनांच्या सर्व विभागांना अलर्ट केलं होतं. या सर्व पातळ्यांवर एकत्र मिळून मदत कार्य आणि बचाव कार्य सुरू झालं.पण विमानात सव्वा लाख लिटर इंधन होतं. तापमान इतकं वाढलं की, कुणालाही वाचवण्याची संधी मिळाली नसल्याची खंत अमित शाहांनी यावेळी बोलून दाखवली.
तसेच अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनं संपूर्ण देश स्तब्ध झाला असून ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांप्रती भारत सरकार,गुजरात सरकार, भारताचे पंतप्रधान यांच्यावतीनं संवेदना व्यक्त करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
शाह म्हणाले, एअर इंडियाच्या या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते. यापैकी एक प्रवाशी वाचल्याची एक चांगली बाब समोर आली आहे. मी त्याला भेटून आलो आहे. मृत्यूंची संख्या डीएनए परीक्षण आणि प्रवाशांची ओळख पटवल्यानंतर प्रशासन अधिकृतपणे जाहीर करेल, असंही त्यांनी म्हटलं.
प्रशासनाकडून सर्व विमान प्रवाशांच्या मृतदेहाला बाहेर काढण्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. ज्या प्रवाशांचे नातेवाईक इथं पोहोचले आहेत, त्यांचे डीएनए घेण्याचं काम दोन तीन तासांत पूर्ण होईल. याचवेळी विदेशात ज्यांचे नातेवाईक आहेत, त्यांना या घटनेची माहिती देण्याचं काम झालं आहे. ते जेव्हा पोहोचतील तेव्हा डीएनए घेतले जातील. जितके मृतदेह मिळाले आहेत, त्यांचे डीएनए नमुने घेण्याची कार्यवाही पूर्ण झाल्याचंही शाह यांनी जाहीर केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.