India-Canada Relation : Sarkarnama
देश

India-Canada Relation : भारत-कॅनडा संबंध बिघडल्यास 'या' गोष्टींवरही होणार गंभीर परिणाम

अनुराधा धावडे

International Politics : भारताने 21 सप्टेंबर रोजी कॅनडाच्या नागरिकांचा भारतातील व्हिसा रद्द केला आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील बिघडलेल्या संबंधांदरम्यान दोन्ही देशांमधील तणावही वाढला आहे; पण भारत आणि कॅनडातील संबंध असेच बिघडत राहिले तर अनेक गोष्टींवर याचा परिणाम होणार आहे.

- कॅनडामध्ये शिकायला गेलेले विद्यार्थी

अमेरिका आणि ब्रिटननंतर सर्वाधिक भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी कॅनडात जातात. इमिग्रेशन, रिफ्युजी आणि सिटीझनशिप कॅनडाच्या आकडेवारीनुसार, 2002 मध्ये दोन लाख 26 हजार 450 भारतीय विद्यार्थी कॅनडातील विविध संस्थांमध्ये शिकण्यासाठी गेले होते. या संदर्भात, भारतातून कॅनडात शिकण्यासाठी जाणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी भारतातील विद्यार्थ्यांची संख्या 40 टक्के आहे.

पण दोन्ही देशांतील संबंध बिघडल्यास त्यांचे काय होईल, अशी भीती या विद्यार्थ्यांना सतावत आहे. या बिघडत्या संबंधांचा त्यांच्या शिक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही. काही भारतीय विद्यार्थ्यांनी तिथे अर्ज केले आहेत. त्याच्या चाचण्या होणार आहेत, त्याचे काय होणार? तसे तेथे शिकण्यासाठी जाणारे विद्यार्थी कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत 30 टक्के योगदान देतात.

- कायम रहिवासी अर्जदार चिंतेत

भारतातून कॅनडात शिक्षण आणि नोकरीसाठी स्थायिक होणाऱ्या भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. पंजाबी आणि शीख लोक मोठ्या प्रमाणात कॅनडात जात असतात. गेल्या अनेक दशकांमध्ये कॅनडामध्ये स्थलांतरित होणाऱ्या भारतीयांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. आकडेवारीनुसार, 2022 मध्ये 4.32 लाख स्थलांतर अर्ज मंजूर करण्यात आले होते, यात भारतीयांचे प्रमाण सर्वाधिक अग्रस्थानी होते. पण आता जे भारतीय कामासाठी किंवा व्यवसायाशी संबंधित कामासाठी कॅनडात आहेत, त्यांना काळजी वाटत आहे की, भारत आणि कॅनडामधील वाढत्या तणावामुळे त्यांच्या कायम निवासी अर्जांवर परिणाम होईल.

- कॅनडात वास्तव्यात असणाऱ्या भारतीयांना भीती

भारतातून कॅनडात स्थायिक झालेल्या नागरिकांपैकी सात लाखांहून अधिक शीख कायमस्वरूपी कॅनडात स्थायिक झाले आहेत. शिखांनंतर हिंदूंचा दुसरा क्रमांक लागतो. इंडो कॅनेडियन सोसायटीमध्ये शीख 34 टक्के आणि हिंदू 27 टक्के आहेत. त्यामुळे भारत-कॅनडा संबंध अधिक बिघडल्यास येथील हिंदू नागरिकांना हिंसाचाराची भीती सतावत आहे. अलीकडे कॅनडात खलिस्तान समर्थक चळवळी आणि निदर्शने जोर धरू लागल्यापासून हिंदू आणि हिंदू मंदिरांवर हल्ले वाढले आहेत. अलीकडेच एका शीख फुटीरतावादी नेत्यानेही हिंदूंविरुद्ध हिंसाचाराचा इशारा दिला आहे.

- दोन्ही देशांच्या व्यापारावर परिणाम

कॅनडा सरकारच्या मते, 2022 मध्ये कॅनडा-भारत द्विपक्षीय वस्तूंचा व्यापार अंदाजे $12 अब्ज कॅनेडियन डॉलर ($9 बिलियन यूएस) होईल, जो एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 57 टक्क्यांनी वाढेल. कॅनडा हा भारतातील 17वा सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार असून, 2000 पासून भारताने 3.6 बिलियन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. त्यामुळे जर भारत-कॅनडा संबंध बिघडल्यास गुंतवणूकीवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

- फ्लाइट्सच्या संख्येवर परिणाम होईल

गेल्या वर्षीपर्यंत भारत आणि कॅनडा दरम्यान आठवड्यातून सुमारे 40 उड्डाणे होत होती. परंतु गेल्या वर्षी करार झाला की, दोन्ही देश आता उड्डाणे वाढवतील आणि त्यासाठी त्यांनी दोन्ही देशातील नवीन शहरांमध्ये पोहोचण्याचा निर्णयही झाला होता. पण आता यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT