Vishwas Patil On Chhatrapati Sambhaji Maharaj Sarkarnama
महाराष्ट्र

Vishwas Patil : छत्रपतींच्या घातपातास फक्त फंद फितुरी जबाबदार? विश्वास पाटील नेमकं असं का म्हणाले?

Vishwas Patil On Chhatrapati Sambhaji Maharaj : सध्या छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहचत आहे अशी अनेकांच्या तोंडातून उद्गार येत आहेत. अशातच संभाजी महाराज यांच्याशी झालेल्या दगाफटक्यावरून काहीजण ब्राह्मण, मुस्लिम, मराठा सरदारांसह शिर्के घराण्याला दोष देताना दिसत आहेत.

Aslam Shanedivan

Maharashtra Politics On Sambhaji Maharaj : सध्या दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा छावा चित्रपट चांगलाच चर्चेत असून तो मराठी माणसाच्या अपेक्षांना पात्र ठरला आहे. या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समोर आल्याच्या भावना आता व्यक्त होत असतानाच त्यांना झालेल्या दगाफटक्यावरून चर्चा सुरू झाली आहे. याच दगाफटक्यावरून ब्राह्मण, मुस्लिम, मराठा सरदारांसह राजे शिर्के घराण्याला आता दोष दिला जातोय. यावरून सध्या वाद सुरू झाला असून राजे शिर्के घराण्याने दिग्दर्शकांचा विरोधातील रस्त्यावरील आणि न्यायालीयन लढाईचा शंख फुंकला आहे. याचदरम्यान लेखक विश्वास पाटील यांनी काही प्रश्न उपस्थित करताना या वादत उडी घेतली आहे.

लेखक विश्वास पाटील यांनी, छत्रपतींच्या दगफटक्यास केवळ ब्राम्हण, मुस्लिम किंवा मराठा सरदार जबाबदार होते असे नाही. त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नसल्याचे म्हटले आहे. तर छत्रपती संभाजी महाराजांना सर्वच जातीधर्मातील लोकांनी दगफटका दिल्याचे विश्वास पाटील यांनी दावा केला आहे.

सध्या छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहास समोर आल्याचे अनेकांचा दावा आहे. तर अनेक जण यासाठी कोणा ना कोणाला जबाबदार धरत आरोपीच्या पिंजऱ्यात उभ करत आहेत. तर छत्रपतींच्या घातपातास कोण जबाबदार अशी चर्चा करताना मार्टिन सारख्या ब्रिटीश लेखकाचा उल्लेख करताना दिसत आहेत.

पण हे खरं नसल्याचा दावा आता लेखक विश्वास पाटील यांनी केला असून ब्रिटीश लेखक मार्टिन हा मूर्ख आणि गैरजबाबदार होता असे म्हटलं आहे. त्यांने आपल्या डायरीत छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल निंदक असे उद्गार लिहले आहेत. त्यामुळे त्याच्या डायरीवर कोणीच विश्वास ठेवून कोणाला जबाबदार धरू नका.

छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांना जो दगाफटका झाला त्यात फक्त एका समाजाचा, धर्माची लोकं होती असे नाही. त्यात सर्वच जातीधर्माचे माणसं सामिल होती, असेही विश्वास पाटील यांनी म्हटलं आहे.

छत्रपतींकडे ब्राम्हण कारभारी, मराठे सरदार आणि मुस्लिम वकील होते असेच नाही. यांनीच त्यांना दगा दिला असे आज बोलले जात आहे. पण त्यांच्याकडे यांच्याशिवाय सर्वच जातीधर्माचे लोक होते. हा दगाफटका फंद फितुरीचा प्रकार होता. त्यामुळेच संभाजी महाराजांनी काही कारभाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली दिले होते. तर फंद फितुरीच्या प्रकारात मानाजी मोरे, गंगाधर पंडीत, वासुदेव पंडीत आणि शाहूजी सोमनाथ यांना अटक झाली होती.

काजी हैदर कोणाला मिळाला?

शिवरायांनी आपल्या मर्जीतल्या काजी हैदर याची मुख्य न्यायाधीश म्हणून रायगडवर नियुक्ती केली होती. ते शिवरायांशी एकनिष्ठ राहिले. पण छत्रपती संभाजी महाराजांशी त्यांनी दगा केला. ते मोगलांना जाऊन मिळाले. याचा अर्थ संभाजी महाराजांना सर्वच जातीधर्माच्या लोकांनी विरोध केला. तो फक्त जहागिरी, पैसा आणि वतनासाठी होता, असाही दावा लेखक विश्वास पाटील यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT