Baramati News: एकीकडे देशभरात 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला,पण त्याचवेळी नाशिकमध्ये या कार्यक्रमाला गालबोट लागले. मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये ध्वजवंदनानंतर केलेल्या आपल्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्यानं वन विभागाच्या माधवी जाधव या महिला कर्मचाऱ्यानं आक्षेप घेत मीडियावरच संताप व्यक्त केला. याचदरम्यान आता बारामतीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षांवर शाईफेक केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.
बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर मंगळवारी (ता.27) शाईफेक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सुपा येथे नगराध्यक्ष सातव यांच्यासोबत हा प्रकार घडला. सचिन सातव यांच्या अंगावर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्यानं बारामतीत नव्या वादाला तोंड फुटले आहे.
बारामतीत प्रजासत्ताक दिनानिमित्तविविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचदरम्यान, बारामती नगर परिषदेतही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मात्र, याठिकाणी प्रजासत्ताक दिनी नगरपालिकेमध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावल्यामुळे वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
वंचितच्या या आक्रमक कार्यकर्त्यांनी बारामती तालुक्यातील सुपे येथे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक करत याठिकाणी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे.
संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आहे. या खास दिना निमित्त संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बारामती नगर परिषदेतही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र काल प्रजासत्ताक दिनी नगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावल्यामुळे वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
या आक्रमक कार्यकर्त्यांनी बारामती तालुक्यातील सुपे येथे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक केली. यानंतर या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये ध्वजवंदन केल्यानंतर उद्भवलेल्या भाषणामुळे नवा वाद पेटला आहे. त्यांनी आपल्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी महाजन यांच्यावर आक्षेप घेतला होता. महाजन यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला होता. संपूर्ण राज्यात या प्रकरणाचे पडसाद उमटल्याचे पहायला मिळाले होते.
मंत्री गिरीश महाजन यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेण्याच्या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना दिलगिरी व्यक्त केली आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचे माझ्याकडून अनवाधानाने राहिले असेल. आंबेडकर यांचे नाव न घेण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. मी फक्त घोषणा दिल्या. भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. तसेच कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
आंबेडकर यांचे नाव न घेण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. मी फक्त घोषणा दिल्या. भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. तसेच कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.