Aditi Tatkare, Sunil Tatkare and Bharat Gogawale Sarkarnama
महाराष्ट्र

Raigad Guardian Minister : 'पालकमंत्री' वाद उफाळला, गोगावलेंच्या टीकेनंतर राष्ट्रवादीचा इशारा

Bharat Gogawale -Tatkare Guardian Minister Dispute : आदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदाला आता जिल्ह्यात चांगलाच विरोध वाढला आहे. जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Aslam Shanedivan

Pune News : आदिती तटकरे यांच्या रायगडच्या पालकमंत्रीपदाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा विरोध होत आहे. मंत्री भरत गोगावले यांचीच रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती व्हावी अशी मागणी आता कार्यकर्त्यांनी केली असून दबाव वाढवला आहे. यासाठी आंदोलन देखील केले आहे. यादरम्यान गोगावले यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यासह आदिती तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेली राष्ट्रवादीने उत्तर देताना इशारा दिला आहे. तसेच जशाच तसे उत्तर दिले जाईल असेही म्हटले आहे. यामुळे रायगडमध्ये पालकमंत्रीपदावरून तटकरे-गोगावले वाद वाढतच जाण्याची शक्यता आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकताच जिल्ह्यातील पालकमंत्रीपदांची नावे जाहीर केली. यावरून नवा वाद सुरू झाला आहे. नाशिक, आणि रायगडमध्ये पेच निर्माण झाल्याने दोन्ही नियुक्त्या रद्द करण्याची फडणवीस सरकारवर मोठी नामुष्की आली आहे. यानंतर आता शिवसेना-राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काहीच आलबेल नसल्याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे.

दरम्यान मंत्री भरत गोगावले यांनाच रायगड द्यावे, अशी मागणी करताना रायगड जिल्ह्यातील सर्वच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने वाद विकोपाला गेला आहे. यावरूनच गोगावले यांनी तटकरे यांना निशान्यावर घेतले आहे.

गोगावले यांनी तटकरे यांच्यावर टीका करताना, लोकसभेला राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रात कुठेही सीटा आल्या नाहीत. पण आम्ही तटकरेंच्या विजयासाठी जिवाचं रान केलं, रायगडचा किल्ला राखला. पण तटकरे यांनी काय केलं? त्यांनी जिल्ह्यातील तीन आमदारांना पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा भरत गोगावले यांनी केला होता.

यावरून आता मोठा वाद सुरू झाला असून या वादात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उडी घेतली आहे. येथे गोगावले समर्थकांसह शिवसेनेला इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी तटकरे यांच्यावर टीका सहन केली जाणार नाही, असे म्हटले आहे. तसेच आदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांच्यावर वैयक्तिक टीका कोणी करू नये. तशी कोणी टीका केली तर राष्ट्रवादी ती खपवून घेणार नाही, असेही म्हटले आहे.

तसेच परांजपे म्हणाले, सुनील तटकरे आणि आदिती तटकरे व तटकरे कुटुंबीय यांच्याबद्दल जी भषा वापरली ती अशोभनीय, निंदणीय आहे. शिवाय महायुती धर्माला गालबोट लावणारी आहे. तर पालकमंत्री नियुक्त्यांची घोषणा झाल्यानंतर ज्या प्रकारे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा रस्त्यावर टायर जाळले, आंदोलन केले हे कृत देखील असंसदीय असल्याचेही परांजपे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT