Jain Community Protest Dadar Kabutarkhana BMC Pigeon Ban: Sarkarnama
महाराष्ट्र

Kabutarkhana Ban : कबूतरांखान्यांनी मुंबई तापवली : मराठी विरुद्ध जैन-गुजराती वादाला 'दाणे'

Jain Gujarati vs Marathi committee News : मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने मुंबईतील कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना खाणे घालण्यास मनाई केली होती. मात्र, यानंतरही जैन समुदाय कबुतरखाने वाचवण्याचा हेका सोडायला तयार नाही. त्यामुळे मराठी एकीकरण समितीविरुद्ध जैन-गुजराती समाजात वाद रंगला आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : मुंबईतील कबुरतरखाने बंद करण्याच्या वादाने आता मराठी विरुद्ध जैन-गुजराती समाज असे स्वरुप घेतले आहे. जैन समाजाचा हे कबुतरखाने बंद करण्याला विरोध आहे. तर मराठी एकीकरण समितीचा कबुतरखाने बंद ठेवण्याला समर्थन दिले आहे. हे दोन्ही समाज आता आपल्या आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे.

खरंतर कबुतरखाने बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने कबुतरखाने बंद करत ताडपत्रीने ते झाकले होते. याविरोधात जैन समुदाय प्रचंड आक्रमक झाला. 6 ऑगस्ट रोजी आंदोलन करत कबूतरखान्यावरील ताडपत्री काढून टाकली. बांबू तोडले. ताडपात्रीवरील दोऱ्या आणि सुतळी कापण्यासाठी महिला चाकू घेऊन आल्या होत्या. मात्र, प्रशासनाने पुन्हा हा कबुतरखाना बंद केला.

त्यामुळे आक्रमक झालेल्या जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी धर्मासाठी शस्त्र हाती घेण्याची भाषा केली, धर्मासमोर न्यायालयाला मानत नसल्याचे म्हटले आहे. या इशाऱ्यानंतर मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली परप्रांतीयाना धडा शिकवला पाहिजे. नोकऱ्या, व्यवसाय करता ते करा, स्थानिकांच्या विरोधात, सरकारच्या विरोधात, पोलिसांच्या विरोधातील, नागरिकांच्या आरोग्याच्या विरोधातील कृत्य आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा समितीने दिला.

शिवाय बुधवारी (13 ऑगस्ट) आंदोलन कबूतरखाना परिसरात आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानुसार मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन करत कबूतरखाने बंद ठेवण्याला समर्थन देण्यात आले. हे आंदोलन धार्मिक नसून सामाजिक आहे. या कबुतरखान्यांमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, असे म्हणत घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी आंदोलकांची संख्या जास्त झाल्याने आणि आंदोलन आक्रमक झाल्याने पोलिसांकडून अध्यक्षांची आणि कार्यकर्त्यांची धरपकडही करण्यात आली. त्यावर जैन - गुजराती समाजाच्या आंदोलनातील त्यातील किती जणांना ताब्यात घेतले? न्यायालयाचा आदेश न मानणाऱ्या, ताडपत्री फाडणाऱ्या किती जणांवर कारवाई केली? असा प्रतिप्रश्न आंदोलनकांनी केला. त्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कबूतरांना दाणे टाकण्यावरून निर्माण झालेल्या वादाला कधी धार्मिक रंग दिला जातोय तर कधी प्रांतिक अस्मितेशी त्याला जोडलं जात आहे. काहीजण राजकीय पोळी भाजून घेणाचाही प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मुंबईतील वातावरण चांगलेच तापले आहे. कबुतरखान्यांच्या निमित्ताने येत्या काळात मराठी विरुद्ध जैन-गुजराती समाज असा उघड उघड वाद पेटण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT