Maharashtra Government Job Transfers News update Sarkarnama
महाराष्ट्र

Sarkari Naukri: सरकारी बदलीचे नियम बदलले! राजकीय दबाव आणल्यास कारवाई होणार; असा असेल प्राधान्यक्रम

Maharashtra Government Job Transfers News update:महाराष्ट्र सरकारने बदली नियमांमध्ये मोठा बदल करत टक्केवारीनुसार बदली प्रणाली लागू केली आहे. राजकीय दबाव टाकल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Mangesh Mahale

Maharashtra Govt Changes Transfer Rules: सरकारच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सरकारने कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत, बदली (Transfer) प्रक्रियेसंदर्भातील नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. नव्या शासन आदेशामुळे (GR) बदली प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुसूत्र आणि कर्मचारी-केंद्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता टक्केवारीनुसार बदली होणार आहे. बदलीसाठी राजकीय दबावतंत्राचा वापर केल्यास संबंधित कर्मचारी शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र राहील.

कही खुशी कही गम

या निर्णयामुळे काही सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर काहींना धक्का बसेल, असा हा निर्णय आहे. नव्या शासन आदेशानुसार बदली प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यावर भर देण्यात आला आहे.काय बदल झाले जाणून घ्या.

कोणत्या विभागात बदल्या

महाराष्ट्र सरकारच्या अख्तयारित येणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागानं 15 एप्रिल रोजी एक शासन आदेश जारी केला. पदांमध्ये समतोल, पारदर्शकता राखण्यासाठी सर्वसमावेशक बदली धोरण निश्चित करण्यात आले आहे. गट ब, क आणि ड मधील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.अधिकारी, कर्मचाऱ्यांकरीता सर्वसमावेशक बदल्यांचे धोरण, कार्यपध्दती व निकष निश्चित करण्यात आलेले आहेत.

बदली वर्ष

  • कॅलेंडर वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत बदल्या करावयाच्या आहेत ते वर्ष,असे गृहीत धरण्यात येणार आहे.

  • कर्मचाऱ्याची बदलीसाठी गृहित धरावयाची सेवा ही बदली वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत पूर्ण झालेली सलग वास्तव्य सेवा असेल, असे जीआर मध्ये म्हटले आहे.

वर्षात एकाच वेळी बदली नाही

तुमच्या कार्यालयातील किंवा विभागातील एकूण कर्मचाऱ्यांच्या तीस टक्क्यांपेक्षा अधिक नसतील इतक्या कर्मचाऱ्यांची एका वर्षात एकाच वेळी बदली करण्यात येणार नाही.

विनंती अर्ज

इच्छुक ठिकाणी बदलीसाठी राजकीय दबावतंत्राचा वापर केल्यास संबंधित कर्मचारी शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र राहील.

विनंती बदल्यांचे आदेश सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यात जारी केले जातील.

अशा होणार टक्केवारीनुसार बदल्या, असा असेल प्राधान्यक्रम

  1. पक्षाघाताने आजारी कर्मचारी/कुटुंबातील सदस्य

  2. अपंग कर्मचारी / मतिमंद मुलांचे पालक

  3. हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी/कुटुंबातील सदस्य

  4. मुत्रपिंड रोपण केलेले/डायलिसीस सुरु असलेले कर्मचारी

  5. कॅन्सरने आजारी कर्मचारी किंवा कुटुंबातील सदस्य

  6. आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा

  7. विधवा, कुमारीका, परित्यक्ता किंवा घटस्फोटीत महिला कर्मचारी

  8. वयाची ५३ वर्षे पूर्ण केलेले कर्मचारी (विनंती केल्यास)

  9. पती-पत्नी एकत्रीकरण.

  10. दहावी-बारावीमध्ये पाल्य शिक्षण घेत असलेले कर्मचारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT