Tanaji Sawant, Pratap Sarnaik  Sarkarnama
मराठवाडा

Tanaji Sawant News : नाराज तानाजी सावंतांना पालकमंत्री सरनाईकांनी सुनावले खडे बोल; म्हणाले, 'राजकीय खुर्ची नेहमीच...'

Tanaji Sawant controversy News : धाराशिव जिल्ह्यातील शिवेसेनेचे बडे नेते नेते तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळालेले नाही, त्यामुळे ते नाराज आहेत.

सरकारनामा ब्युरो

Dharashiv News : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक बड्या नेत्यांना वगळले आहे. त्यांच्या जागी या तीन पक्षाकडून मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे काही अनुभवी नेत्यांची संधी हुकली. धाराशिव जिल्ह्यातील शिवेसेनेचे बडे नेते नेते तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळालेले नाही, त्यामुळे ते नाराज आहेत. त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करीत गेल्या दीड महिन्यापासून कार्यक्रमाला दांडी मारली आहे. दुसरीकडे रविवारी धाराशिवमध्ये नवे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थित झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीला तानाजी सावंत यांनी दांडी मारली. त्यानंतर सरनाईक यांनी नाराज सावंतांना खडे बोल सुनावले आहेत.

प्रजासत्ताक दिन रविवारी साजरा झाला. त्याच्या पूर्वसंध्येलाच पालकमंत्री सरनाईक धाराशिवमध्ये आले आहेत. त्यांनी शनिवारी कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर रविवारी त्यांच्या हस्ते झेंडावंदन पार पडले. त्यानंतर त्यांनी पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीला शिंदे सेनेचे जिल्ह्यातील एकमेव आमदार तानाजी सावंत यांनी दांडी मारली. त्यामुळे प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी सावंत यांना खडेबोल सुनावले आहेत.

प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पहिल्या जिल्हा नियोजन बैठकीला तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी दांडी मारली. त्यावर सरनाईक म्हणाले, 'राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही, ती बदलत असते. या खुर्चीची नेहमीच आदलाबदल होत असते.' असे सांगत त्यांनी यावेळी योग्य संदेश देण्याचा प्रयत्न केला. याबाबत सावंत यांच्याशी आपलं काहीही बोलणं झाले नाही, असेही यावेळी स्पष्टपणे सांगितले.

सरनाईक यांनी पहिल्याच जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री म्हणून यांनी मोठे निर्णय घेतले. त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यात पाऊल ठेवताच त्यांनी शनिवारी धाराशिव जिल्ह्यासाठी नवीन ५० लालपरी देण्याची घोषणा केली. त्यांनी पहिल्याच दौऱ्यात केलेल्या या मदतीच्या घोषणेतून धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या दृष्टीने आनंदाची बातमी दिली.

दरम्यान, एसटीची भाडेवाढ झाली असली तरी आता चांगल्या सुधारणाही देण्याचा प्रयत्न असणार आहे. दरवर्षी एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन पाच हजार बस दाखल होतात. पुढील पाच वर्षात एकूण 25 हजार नवीन बस गाड्या घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी नवीन 50 लालपरी बसगाड्या देत असल्याची घोषणा सरनाईक यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT