Imtiaz Jaleel News Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil News : इम्तियाज जलील म्हणतात, 'पहले दिल्ली, फिर गल्ली'!

Imtiaz Jalil claims that a miracle will happen in the upcoming municipal elections. Read on for insights about his statement and the expectations for the elections : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाचा पराभव झाला असला तरी लोकांचा पाठिंबा वाढतो आहे. विधानसभेला आम्ही दोन जागा लढवल्या, त्या थोडक्यात हरलो. पण महापालिका निवडणुकीत आम्ही चमत्कार घडवू.

Jagdish Pansare

AIMIM News : महापालिका निवडणुक मार्च महिन्यानंतर होण्याची शक्यता लक्षात घेऊन सगळे राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागले आहेत. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना-भाजपमध्ये इतर पक्षातून इनकमिंग मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत गेली पंचवीस वर्ष युतीची सत्ता होती. आता मात्र भाजपला शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नकोशी झाली आहे.

भाजपने स्वबळाची तयारी सुरू केली आहे, तर शिवसेनेचे नेते (AIMIM) एमआयएमला रोखण्यासाठी युतीच पाहिजे, असे म्हणत आहे. ज्या एमआयएमचा धसका सत्ताधारी शिवसेनेने घेतला आहे, त्या पक्षात मात्र सध्या शांतता आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील आणि त्यांची संभाजीनगरमधील संपूर्ण टीम सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेली आहे.

एमआयएमने दिल्ली विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर लक्ष केंद्रीत करून त्या निवडून आणण्यासाठी शक्तीपणाला लावली आहे. महापालिका निवडणुकी संदर्भात (Imtiaz Jaleel) इम्तियाज जलील यांना विचारले तेव्हा, पहले दिल्ली, फिर गल्ली' असे म्हणत तीन फेब्रुवारीनंतर आम्ही महापालिकेसाठी 'अॅक्शन मोड'वर येऊ, असे 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

सत्ताधारी शिवसेना महायुतीने तुमच्या पक्षाचा धसका घेतला आहे, तुमची तयारी कधी सुरू करणार यावर ते वेगवेगळे लढणार आहेत, आम्हीही स्वबळावरच लढणार आहोत? लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाचा पराभव झाला असला तरी आम्हाला असलेला लोकांचा पाठिंबा वाढतो आहे. विधानसभा निवडणुकीत आम्ही दोन जागा लढवल्या,त्या थोडक्यात हरलो. पण महापालिका निवडणुकीत निश्चितच आम्ही चमत्कार घडवू.

कोण स्वबळावर लढते की युतीत हे आमच्यासाठी महत्वाचे नाही. लोकांचे प्रश्न घेऊन मी आणि माझा पक्ष सातत्याने रस्त्यावर उतरला आहे. प्रशासनाला धारेवर धरून आम्ही जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत याची पावती मतदारांनी आम्हाला दिली आहे. विधानसभेत माझा पराभव कसा झाला, सत्ताधारी भाजपने पैसा आणि सत्तेचा कसा दुरुपयोग केला? हे लोकांना माहित आहे.

परंतु त्यात आता आम्ही अडकून पडणार नाही. महापालिका निवडणुकीत आम्ही निश्चितच मुसंडी घेऊ. पक्षाची कार्यकारणी, संघटनात्मक बांधणी या सगळ्याच गोष्टींवर आम्हाला काम करायचे आहे. दिल्ली विधानसभेची निवडणूक संपल्यानंतर लगेचच आम्ही हे काम हाती घेणार आहोत.शहरातील नागरिकांना दररोज स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे, याला आमचे प्राधान्य असणार आहे. या शिवाय गुन्हेगारी, नशाबंदी सारखे विषय याविरोधात आमचा पक्ष अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT