CM Eknath Shinde, Ajay Baraskar, Manoj Jarange Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : जरांगेंनी मराठा समाजाचा 'करेक्ट कार्यक्रम' केला! बारस्करांचा आरोप...

Amol Sutar

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांचे पूर्वीचे सहकारी अजय महाराज बारस्कर यांनी आज जरांगे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यांच्यामुळेच मराठा समाजाचे नुकसान झाले असून, त्यांनी त्यांचा आडमुठेपणा सोडून द्यावा, असा टोला लगावला आहे. आज कोटींची सभा असणारा समाज दोनशे लोकांवर आला आहे. याच्या आधी तुमच्यावर एकही नेता टीका करत नव्हता, कालपासून तुमच्यावर प्रचंड टीका होत आहे, तर जरांगेंनी मराठा समाजाचा 'करेक्ट कार्यक्रम' केला असल्याचा आरोप अजय महाराज बारस्कर यांनी केला आहे.

अजय बारस्कर यांनी आज माध्यमांशी संवाद साधत त्यांच्यावर मनोज जरांगे यांच्याकडून होत असलेल्या आरोपांचे खंडन केले. ते म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस यांचा माणूस असून, माझ्याकडे तीनशे कोटींची संपत्ती आहे. तसेच बलात्कार, अत्याचारासारखे प्रकार केले आहेत. मात्र, या सर्व आरोपांचे गावातील लोकांनी योग्य वेळी खंडन केले असून, मी त्यांचा आभारी असल्याचे बारस्कर महाराजांनी सांगितले.

ते म्हणाले, मनोज जरांगे हेकेखोरपणा करत आहेत. त्यांच्या या आडमुठेपणामुळे समाजाचे नुकसान झाले आहे. ते सध्या राजकीय टीका करत आहेत. आपली ही लढाई आरक्षणासाठी आहे की, राजकीय टीका करण्यासाठी आहे, हे त्यांच्या आता लक्षात येत नाही. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. पण त्यांच्यावर राजकीय टीका करण्याचा आपला काही संबंध नाही. असे असताना त्यांनी राजकीय नेत्यांना लक्ष्य केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगेंनी टीका केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'लिमिटच्या पुढे गेला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो,' असे सांगितले होते. या प्रतिक्रियेवरून बारस्कर महाराजांनी जरांगेंना चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले, आपली ही लढाई आरक्षणासाठी आहे, की राजकीय टीका करण्यासाठी आहे. लिमिटच्या पुढे गेला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले असले तरी हा तुमचा नाही तर समाजाचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.

आतापर्यंत इतके दिवस मराठा आरक्षण मिळविण्यासाठी केलेले आंदोलनातून काय मिळालं, असा प्रश्न बारस्कर यांनी जरांगेंना केला. ते म्हणाले, उपोषणातून तीस ते चाळीस हजार कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. त्यातही अडचणी आहेत, अशी परिस्थिती आहे. सरकारची इच्छाशक्ती असेल तर ते काम करेल. तुम्ही रागाच्या भरात तमाशा केला आहे, अशी टीका या वेळी बारस्कर महाराजांनी जरांगेंवर केली.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT