Suresh Dhas  sarkarnama
मराठवाडा

Suresh Dhas statement : काही गोष्टी गोपनीय ठेवलेल्याच बऱ्या; सुरेश धसांचे वक्तव्य बीडचे राजकारण तापवणार ?

Santosh Deshmukh Murder Case News : या प्रकरणात दोषी असलेल्या आकाच्या आकाची राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यानंतर या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आता करुणा मुंडे यांनी केली असल्याचे आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामा ब्युरो

Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. या प्रकरणी आठ जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणातील एक जण फरार असून पोलिस यंत्रणा त्याचा युद्धपातळीवर शोध घेत आहे. दुसरीकडे या प्रकरणात दोषी असलेल्या आकाच्या आकाची राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यानंतर या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आता करुणा मुंडे यांनी केली असल्याचे आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणात आकाच्या पिलावळीचा सर्व माज आता जिरणार आहे. काही गोष्टी गोपनीय ठेवलेल्या बऱ्या आहेत. त्या बोलणं योग्य होणार नाही, त्यामुळे तपास स्पॉइल होईल, असेही भाजपाचे (BJP)आमदार सुरेश धस यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आकाच्या आकाच्या राजीनाम्याची आमची मागणी कायम आहे. आता करुणा मुंडे यांनीही राजीनाम्याची मागणी केली आहे. करुणा मुंडे यांच्याकडे पंकजा मुंडेंबाबत काय माहिती आहे, हे त्यांनाच माहित आहे. आमच्याकडील सर्व माहिती आम्ही देत आहोत. ती माय माऊली एकटी राहते, मुलं देखील तिच्यासोबत नाहीत, असेही धस यावेळी म्हणाले.

परळीतील 500 व्यापारी आणि काही नागरिकांनी गाव सोडले आहे. तिथं अनेक माफिया, राख माफिया, वाळू माफिया आहेत. आकाच्या आकाची पिलावळ आहे, त्यांचा सर्व माज आता जिरणार आहे. काही गोष्टी गोपनीय त्या बोलणं योग्य होणार नाही, अन्यथा तपास स्पॉईल होईल, यासाठी आपण धनंजय देशमुख यांना देखील समजावून सांगणार आहोत. या प्रकरणातील फरार आरोपी कुठेही गेला तरी तो सापडेल. आमचा पोलीस आणि गृह विभागावर पूर्ण विश्वास आहे, असेही सुरेश धस (Suresh Dhas)यांनी सांगितले.

दरम्यान, परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात दोषी पोलिसांवर कठोर कारवाई आणि कुटुंबियांना आवश्यक असलेली नुकसान भरपाई देण्याची मागणीसाठी निघालेला मोर्चा रद्द करण्यात आला आहे. परभणीच्या पालक मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना मोर्चा रद्द करण्याची विनंती केली.

या प्रकरणात आपण पहिल्या दिवसांपासून आंदोलकांच्या संपर्कात आहोत. पायी चालणे अत्यंत क्लेशकारक आहे. या प्रकरणात ५ पोलीसांना निलंबित केले आहे. त्यांच्या इतर मागण्यांची पूतर्ता एक महिन्यात व्हावी, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांचा कानावर सर्व घातले आहे, असे यावेळी सुरेश धस यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT