बीड : जिल्ह्यातील गुंडगिरी, अशांतता याला वाल्मीक कराडच जबाबदार आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनामागचा मास्टरमाईंडही तोच आहे, त्यानेच जिल्ह्यात काशी केली, अशा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Sandip Kshirsagar) बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या समोरच संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराडचे नाव घेत खळबळ उडवून दिली.
बीड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा खासदार शरद पवार आज बीड दौऱ्यावर होते. सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घूण हत्येनंतर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. देशमुख यांच्या मारेकऱ्यांना व या हत्येमागे असलेल्या मास्टरमाईंडला शोधा, अशी मागणी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्हीकडून केली जात आहे. अशातच बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्यासमोरच वाल्मीक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचा दावा केला.
त्यानेच जिल्ह्यात काशी केली असून याच वाल्मीक कराडमुळे जिल्ह्यातील शांतता भंग झाली आहे. आता रडून आणि घाबरून चालणार नाही, आपल्याला लढावेच लागेल असे, आवाहन क्षीरसागर यांनी केले. शरद पवार यांनी आज मस्साजोग येथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. संतोष देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतल्याचे सांगतानाच दहशतीतून बाहेर पडा, या परिस्थितीला आपण सगळे एकत्रितपणे सामोरे जाऊ.
या घटनेच्या खोलात जाऊन पाळीमुळे खणून काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा विश्वास शरद पवार यांनी मस्साजोग येथील गावकऱ्यांना आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना दिला. शरद पवार देशमुख कुटुंबाची भेट घेऊन जात नाही, तोच काही तासातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोगला भेट देत देशमुख कुटुंबाची सांत्वन पर भेट घेतली. संतोष देशमुख यांची हत्या दुःख देणारी आहे. या प्रकरणाचा तपास केला जाईल, कुणाचाही राजकीय हस्तक्षेप यात होणार नाही.
तसेच या घटनेमागचा मास्टरमाईंड देखील शोधला जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. एकीकडे सरकार मास्टरमाईंडचा शोध घेत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार मात्र वाल्मीक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचा दावा जाहीरपणे करत आहेत. वाल्मीक कराड याला अटक करा, अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्यासमोरच केली.
वाल्मीक कराड याच्या दहशतीला घाबरायचे नाही, खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत आणि विधानसभेत मी संदीप देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि वाल्मीक कराडला अटक करावी यासाठी आवाज उठवला आहे. यापुढेही जिल्ह्यात शांत न बसता वाल्मीक कराड याच्यावर कारवाई करण्यासाठी सर्वपक्षीय प्रयत्न करणार, असल्याचे संदीप क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले. बीड जिल्हा हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे, परंतु वाल्मीक कराड सारख्या गुंडांनी या जिल्ह्याची शांतता भंग केल्याचा आरोपही संदीप क्षीरसागर यांनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.