Sharad Pawar, Neelam gorhe  Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar Criticized Neelam Gorhe : 'मर्सिडीज'चा आरोप अन् शरद पवारांनी नीलम गोऱ्हेंचा सगळा इतिहासच काढला; म्हणाले, 'त्यांच्या चार टर्म...'

Sharad Pawar on Neelam Gorhe News : दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला, यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : दिल्लीमध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे हे दोन मर्सिडीज घेतल्यानंतर पद देत असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोऱ्हेंचे कान टोचत त्यांनी असे वक्तव्य करायला नको होते, असे म्हटले आहे. त्या पाठोपाठ ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेत नीलम गोऱ्हे यांना सुनावले.

दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना (Shivsena) ठाकरे गटावर गंभीर आरोप केला, यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. यावर आता या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेल्या शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शरद पवार म्हणाले, 'नीलम गोऱ्हे यांनी मर्यादीत काळात विविध पक्षांचा अनुभव घेतला आहे. गोऱ्हेंनी ते वक्तव्य केलं नसतं तर योग्य झालं असतं. अगदीच स्पष्टपणे सांगायचे झाले तर त्यांचे ते विधान म्हणजे मुर्खपणा होता.'

नीलम गोऱ्हे यांनी भाष्य करण्याची गरज नव्हती, हे माझं मत होते. हे संमेलन चांगलं चाललं होतं. सर्वांचा सहभाग होता. त्यात नाही त्या गोष्टी काढायला नको होत्या. त्यांनी कोणत्या गाडीचा उल्लेख केला. मला वाटतं की राज्याच्या विधीमंडळात येऊन त्यांना चार टर्म झाले असतील. या चार टर्म कशा मिळाल्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांचा सहभाग त्याची चर्चा न केलेली बरी, असेही ते म्हणाले.

त्यांची विधीमंडळात एन्ट्री झाली किंवा महाराष्ट्रात झाली ती प्रकाश आंबेडकरांच्या पक्षातून झाली. नंतर त्यांचा काळ राष्ट्रवादीत गेला. त्यानंतर कदाचित त्या काँग्रेसमध्ये होत्या. नंतर त्यांचा काही काळ शिवसेनेते गेला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत गेला. हल्ली त्या शिंदेंच्या संघटनेत काम करत आहेत. मर्यादित काळात त्यांनी दोन चार पक्षाचा अनुभव घेतला आहे. सातत्य होतं की नाही हे माहीत नाही. हा स्वत:चा अनुभव लक्षात घेता, त्यांनी असं भाष्य केले नसते तर योग्य झाले असतं, असा हल्लाबोल यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला.

'या वादावर पडदा पडायला हवा'

साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावरून नीलम गोऱ्हे यांनी ते वक्तव्य टाळायला हवे होते. त्यांनी असे भाष्य केले नसते तर योग्य झाले असते. गोऱ्हे यांनी ते वक्तव्य करण्याची गरज नव्हती. या प्रकरणी साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यानी माफी मागितली पाहिजे. त्यामुळे या वादावर पडदा पडायला हवा, असेही यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT