Bacchu kadu, Neelam Gorhe  Sarkarnama
महाराष्ट्र

Bachhu Kadu Vs Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे अन् ठाकरेंच्या वादात बच्चू कडूंची उडी; म्हणाले, 'हिंमत असेल तर गुन्हा दाखल करा'

Neelam Gorhe vs Thackeray News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीलम गोऱ्हेंनी यांचे कान टोचले. त्या पाठोपाठ शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेत नीलम गोऱ्हे यांना सुनावले आहे. त्यानंतर आता या वादात प्रहार संघटनेचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी उडी घेतली आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : दिल्लीतील साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या, असा आरोप त्यांनी केला होता. यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीलम गोऱ्हेंनी यांचे कान टोचले. त्या पाठोपाठ शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेत नीलम गोऱ्हे यांना सुनावले आहे. त्यानंतर आता या वादात प्रहार संघटनेचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी उडी घेतली आहे.

दिल्लीत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. तीन दिवस झालेल्या या संमेलनाला महाराष्ट्रासह दिल्लीत राहणाऱ्या मराठी माणसांनी मोठा प्रतिसाद दिला. पण या साहित्य संमेलनात बोलताना शिवसेना (Shivsena) (शिंदे) पक्षाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एक गंभीर आरोप केला. त्यामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यावरून आता बच्चू कडू यांनी मोठं विधान केले आहे.

“ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या दिल्या की एक पद मिळते', असे विधान नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर केले. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हिंमत असेल तर नीलम गोऱ्हे यांनी याप्रकरणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी आमदार बच्चू कडू यांनी करीत या वादात उडी घेतली आहे.

गेल्या दोन दिवसापासून या प्रकरणी सत्ताधारी व विरोधकांनी याच मुद्द्यावरून एकमेकांवर सडकून टीका केली जात आहे. त्यामुळे वातावरण तापले असताना हिंमत असेल तर या प्रकरणी नीलम गोऱ्हे यांनी पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कडू यांनी लावून धरली आहे.

दरम्यान, त्यातच आता यावरूनच ठाकरे गटाचे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी यावरून नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी संजय राऊत यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देत जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT