Shankaracharya News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shankaracharya News : शंकराचार्यांची भूमिका ही शुक्राचार्यांसारखी; हिंदू राष्ट्र सेनेची कठोर शब्दात टीका!

Pradeep Pendhare

Ahmednagar News : उच्च कोटीचे साधक असलेले शुक्राचार्य यांनी असुरी शक्तींना पाठबळ दिले होते. त्याच पद्धतीने चार पीठांचे शंकराचार्यही श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना मुहूर्ताला विरोध करून, श्रीराम मंदिराला विरोध करणाऱ्या असुरी शक्तींना पाठबळ देत आहेत, असा दावा हिंदुराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांनी केला. (Latest Marathi News)

अयोध्येतील श्रीराम मंदिर बांधकाम अपूर्ण आहे व या मंदिरातील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेचा मुहूर्तही योग्य नाही, असा दावा चार पीठाच्या शंकराचार्यांनी केला आहे. मात्र, शंकराचार्यांच्या या भूमिकेचा हिंदुराष्ट्र सेनेचे देसाई यांनी निषेध केला आहे. असुरी शक्तिंना साथ देणाऱ्या शुक्राचार्यांसारखे शंकराचार्य आता वागत आहेत. त्यांचे बोलवते धनी कम्युनिस्ट व काँग्रेस आहेत. स्वतःच्या अहंकाराचे तुष्टीकरण करण्यासाठी शंकराचार्य, असे बोलत असल्याने आम्ही त्यांचा निषेध करीत आहोत, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

नवी स्मशानभूमी बांधली व शौचालय बांधले, तरी साधा नगरसेवक त्याचे श्रेय घेतो, अशावेळी अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभारण्यासाठी कृतीशील प्रयत्न करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा राजकीय लाभ घेतला तर वावगे काय? असा सवाल करून देसाई म्हणाले, '22 जानेवारीची श्रीराम प्रतिष्ठापना म्हणजे एका मंदिराचाच नव्हे, हे तर भारत देशाचा जीर्णोद्धार आहे. देशावरील हजारो वर्षांपूर्वीचे कलंकित पर्व धुवून देशाचे चरित्र व चारित्र्य उज्वल करण्याचा प्रयत्न यातून होत आहे. अध्यात्म हे भारतीयत्वाचे प्रतीक आहे, दुधात जसे तूप असते, तसे प्रत्येकात राम आहे. मात्र शंकराचार्यांनी मुहूर्ताला विरोध करून वातावरण गढूळ करण्याचा व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करून सर्व भारतीयांनी 22 जानेवारीचा आनंदोत्सव साजरा करावा," असे आवाहन त्यांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राम मंदिर होत असल्याने काहींना पोटशूळ उठला आहे. मंदिर अर्धवट आहे, असा त्यांचा तर्क आहे. मात्र, पूर्वी भारत देश अफगाणिस्तान पासून बांगला देशापर्यंत होता, तो खंडित झाला व त्याच भारतात आपण राहत आहोत. ज्यांचे पांडित्य जगाने मान्य केले अशा गणेश शास्त्री द्रविड यांनी रामप्रतिष्ठापनेचा मुहूर्त काढला आहे. दिवाळी व गुढीपाडवा कधीपासून सुरू झाले हे आपल्याला माहित नाही, परंतु राम मंदिर उभारणीचा एकमेव असा क्षण आहे की, ज्याचे साक्षीदार आपण आहोत. त्यामुळे सोमवारी सर्वांनी विरक्तीचे प्रतिक असलेला भगव्या ध्वजाची गुढी उभारावी, घराला तोरणे बांधावीत व उत्सव साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT