Jayant Patil On RBI
Jayant Patil On RBI Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil On RBI : "दोन हजाराच्या नोटा किती छापल्या? बँकेत किती अन् व्यवहारात किती? सरकारने हिशेब द्यावा.."

सरकारनामा ब्यूरो

Jayant Patil News : भारतीय रिझव्‍‌र्ह बँकने दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद केले आले. रिझर्व्ह बँकेने बँकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याची आणि बदलण्याची परवानगी देण्यास सांगितले आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 23 मे पासून बँकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. दरम्यान, तर रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील म्हणाले, "दोन हजार रुपयांच्या नोटा मला नाही वाटत कोणाकडे असतील, कारण त्या बाजारातून नाहीसे झाले आहेत. जेव्हा नोटबंदी झाली होती तेव्हा काळा पैसा बाहेर आणण्यासाठी नोटबंदी केल्याचे सरकारने सांगितले होते. पण तसं होताना कुठे दिसलं नाही. याउलट दोन हजार रुपयांची नोट काढून मोठी रक्कम त्यांना साठवता आली."

पाटील पुढे म्हणाले, "परंतु जेव्हा दोन हजार रुपयांच्या नोटा काढण्यात आल्या त्यावेळी पाकिस्तानच्या सीमेवर काही आतंकवाद्यांकडे देखील दोन हजार रुपयांच्या नोटा सापडल्या. पहिल्या नोटबंदीच्या निर्णयानंतर बँकेबाहेर लाईन लावून शेकडो लोकांचे जीव गेले. नोटबंदीमुळे देशाचा विकासदर दोन टक्क्यांनी घसरला. त्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटा याच सरकारने काढले, आता त्याच संदर्भात असे निर्णय घेऊन याने काय फायदा होणार आहे मला माहित नाही."

"दोन हजार रुपयांच्या नोटा सरकारने किती छापल्या, त्या बँकेत किती आहेत आणि एकूण व्यवहारात किती आहेत याचा हिशोब सरकारने द्यावा, म्हणजे या नोटा किती परत येतील याचा अंदाज आपल्याला येईल," असेही जयंत पाटील म्हणाले.

"माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार रुपयांच्या नोटा काही वर्षांपूर्वीच इश्श्यू करणे बँकांनी बंद केले आहे. त्यामुळे अशा घोषणा करून फार मोठे काही साध्य होईल मला असे काही वाटत नाही. दोन हजार रुपयांच्या नोटांनी काळे धन साठवण्याची जी व्यवस्था इथल्या श्रीमंत वर्गासाठी केली होती, ती व्यवस्था आता कमी होईल.पण सरकारने आधी नोटांचा हिशोब द्यावा, आता बघू दोन हजार रुपयांच्या नोटांमुळे काय साध्य होते," असे ही जयंत पाटील म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्तारावर सरकारला टोला -

"मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर करावा कारण अशांत आत्मे आसपास राहणे बरे नाही, त्यामुळे त्यांना लवकरच तृप्त केले पाहिजे. आता वर्षभराचा कालावधी राहिलाय कि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयापर्यंत सरकार राहिल, हे काळ ठरवेल," असे जयंत पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT