Ramdas Athawale, Rahul Gandhi
Ramdas Athawale, Rahul Gandhi sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ज्यांना पक्ष संभाळता आला नाही, ते देश काय जोडणार... आठवलेंची राहूल गांधींवर टीका

हेमंत पवार

कऱ्हाड : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही भारत 'तोडो' यात्रा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळा भारत जोडला आहे. तर राहुल गांधींना पक्ष जोडता येत नाही, पक्ष सांभाळता येत नाही ते भारत काय जोडणार, असा प्रश्न करून काँग्रेस पक्षाची अवस्था गलितगात्र झाली आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर केली आहे.

मंत्री आठवले आज कऱ्हाड दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोंदीचा सामना करणे हे राहुल गांधींचे काम नाही. नरेंद्र मोदींशी सामना करणारा देशात दुसरा कोणीही नेता नाही. राहुल गांधीची भारत जोडो यात्रा ही भारत तोडो यात्रा आहे, अशी टीका करुन ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळा भारत जोडला आहे.

त्यामुळे राहुल गांधींना पक्ष जोडता येत नाही, पक्ष सांभाळता येत नाही ते भारत काय जोडणार आहेत. काँग्रेस पक्षाची अवस्था गलीतगात्र झाली आहे. बिहारचे नितीशकुमार हे मोदींच्या विरोधात विरोधकांनी भेटत आहेत. मात्र, ते येऱ्यागबाळ्याचे काम नाही. जेवढे विरोधक एकत्र येतील तेवढा मोदींनाच फायदा होईल.

मंत्री आठवले आज कऱ्हाड दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोंदीचा सामना करणे हे राहुल गांधींचे काम नाही. नरेंद्र मोदींशी सामना करणारा देशात दुसरा कोणीही नेता नाही. राहुल गांधीची भारत जोडो यात्रा ही भारत तोडो यात्रा आहे, अशी टीका त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळा भारत जोडला आहे. त्यामुळे

राहुल गांधींना पक्ष जोडता येत नाही, पक्ष सांभाळता येत नाही ते भारत काय जोडणार आहेत. काँग्रेस पक्षाची अवस्था गलीतगात्र झाली आहे. बिहारचे नितेशकुमार हे मोदींच्या विरोधात विरोधकांनी भेटत आहेत. मात्र, ते येऱ्यागबाळ्याचे काम नाही. जेवढे विरोधक एकत्र येतील तेवढा मोदींनाच फायदा होईल.

मनसेला सोबत नको...

मुंबई महापालिकेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपने मनसेला बरोबर घेऊ नये. मनसेमुळे परप्रांतीयांची मते मिळणार नाहीत. सध्या शिंदे गट आऱपीआय आणि भाजपबरोबर आहे. त्यामुळे मनसेची गरज नाही, असे ही श्री. आठवले यांनी स्पष्ट केले.

बारामतीत भाजपचाच खासदार होणार

शरद पवार यांची बारामती आपल्या ताब्यात कशी येईल, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी केंद्रीय मंत्रीही त्या लोकसभा मतदारसंघात दौऱ्यासाठी येणार आहेत. २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार आहे. त्या बारामती मतदारसंघातही भाजपची हवा असून बारामतीची जागा आम्ही जिंकू, असा आम्हाला विश्वास आहे, असेही मंत्री आठवले यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT