Raju Shetty, Eknath Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangali Sugarcane FRP News : ऊसदराची बैठक निष्फळ; राजू शेट्टींनी दिला आंदोलनाचा इशारा

Umesh Bambare-Patil

Sangali Sugarcane FRP News : जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तिसरी बैठकही आज निष्फळ ठरली. कारखानदारांनी 3150 रुपये देण्यास सहमती दर्शवली. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 12.50 उतार्‍यास 3250, साडेबारा उतार्‍याच्या आत असणारे 3150 रुपये तर दुष्काळी पट्ट्यातील कारखाने 3100 रुपये दर देतील, असा अंतिम प्रस्ताव दिला. मात्र दोन तासानंतरही ठोस तोडगा न निघत नसल्याने माजी खासदार राजू शेट्टी बैठकीतून बाहेर पडले.

सांगली जिल्हाधिकारी Sangali कार्यालयात जिल्ह्यातील ऊस दरासंदर्भात Sugarcane FRP जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शनिवारी बैठक झाली. या बैठकीला विश्वास कारखान्याचे अध्यक्ष व आमदार मानसिंगराव नाईक, क्रांतीचे शरद लाड, वसंतदादाचे विशाल पाटील, राजारामबापूचे उपाध्यक्ष विजय पाटील, स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संदीप राजोबा, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्याचा फॉर्म्युला सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी स्वीकारण्याची मागणी संघटनेने केली होती, परंतु जिल्ह्यातील कारखानदार 3100 रुपये पहिली उचल देण्यावर ठाम होते. मात्र, दुष्काळ पट्ट्यातील कारखानदारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे शेट्टी यांनी कारखानदारांची मागणी अमान्य केली. त्यामुळे या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांना अंतिम प्रस्ताव दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रस्तावांमध्ये गतवर्षीचा साखर उतारा साडेबारा टक्केपेक्षा अधिक असल्यास पहिली उचल 3250 रुपये, साडेबारा पेक्षा कमी असल्यास 3150 आणि ज्या कारखान्यांचा साखर उतारा 10 टक्के आहे. त्या कारखान्यांनी 3100 रुपये असा शेवटचा प्रस्ताव ठेवण्यात आला. जिल्ह्यातील ऊस दरासाठी कारखानदारांशी दोन तास चर्चा करुनही निर्णय झाला नाही, कारखानदारांनी आमचा प्रस्ताव मान्य न केल्यास आम्ही आमच्या मार्गाने कुठेही आंदोलन करु असा इशारा देत माजी खासदार शेट्टी बैठकीतून बाहेर पडले.

maharashtra Political News

अंतिम प्रस्ताव मान्य करा अन्यथा आंदोलन - शेट्टी

संघटनेने जिल्ह्यातील कारखान्यांना दिलेला अंतिम प्रस्ताव मान्य करावा, अन्यथा आंदोलन अटळ असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. देशात पुढीलवर्षी मोठे संकट आहे. उसाचे क्षेत्र कमी नाही, पण उसाची एकरी उत्पादकता घटली आहे. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती कारणीभूत असल्याची टीकाही त्यांनी केली.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT