Uddhav Thackeray | Manohar Joshi Sarkarnama
महाराष्ट्र

Manohar Joshi : "जिवाला जीव देणारे निष्ठावंत निघून जात आहेत, हे मोठं दुर्दैव", उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला शोक

Akshay Sabale

Manohar Joshi Death News : मनोहर जोशी ( Manohar Joshi ) मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री होते. पण, त्याहीपेक्षा ते सच्चे शिवसैनिक होते. कोणत्याही पक्षाच्या आणि व्यक्तीच्या आयुष्यात चढउतार येत असतात. संकटकाळात मनोहर जोशी शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांबरोबर निष्ठेने उभे राहिले, अशी प्रतिक्रिया शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. ( Uddhav Thackeray On Manohar Joshi Passes Away )

माजी मुख्यमंत्री आणि कडवट शिवसैनिक मनोहर जोशी यांचं हिंदुजा रुग्णालयात शुक्रवारी पहाटे निधन झालं. यानंतर उद्धव ठाकरेंनी आपला बुलडाणा दौर रद्द केला आहे. ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. या वेळी उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, "बेळगाव सीमा आंदोलनावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली होती. तेव्हा शिवसेनाप्रमुखांबरोबर मनोहर जोशी आणि दत्ता साळवीसुद्धा होते. जिवाला जीव देणारे निष्ठावंत आपल्यातून निघून जात आहेत. हे फार मोठं दुर्दैव आहे. जिवाला जीव देणारे कार्यकर्ते तेव्हा होते, आजही आहेत. म्हणून शिवसेना ही प्रत्येकवेळी संकटावर मात करून उभी राहते."

"मनोहर जोशी हे शिवसेनाप्रमुखांच्या पहिल्या फळीतील सहकारी होते. त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन तरुण सहकारी काम करत आहेत. त्यामुळे शिवसेना (Shivsena) संपण्याचा प्रयत्न केला, तरी ती संपत नाही. वाढत आहे. याचं कारण या नेत्यांनी आपल्या आयुष्याची अनेक वर्षे शिवसेना रुजवण्यासाठी वेचली. ती मुळे धरून पुन्हा शिवसेनेला उभारी देत आहेत," असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

"सौम्य शब्द वापरूनसुद्धा कसे मतभेद व्यक्त करू शकतो, हे शिकले"

विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही मनोहर जोशी यांच्या निधानानंतर शोक व्यक्त केला आहे. "श्रद्धा आणि सबुरी ही मनोहर जोशी यांची ब्रीदवाक्य होती. प्रत्येकवेळेला सबुरी त्यांनी आयुष्यभर ठेवली. त्याचवेळेला कामामध्ये ते कुठेही कमी पडले नाहीत.

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या निधनानंतर जोशी सरांची प्रकृती चांगली नव्हती. अनेक आजारांनी ते त्रस्त होते. तरीसुद्धा शिवसेनेवर त्यांचं बारीक लक्ष होतं. त्यांच्या संपूर्ण वाटचालीमधून सौम्य शब्द वापरूनसुद्धा कसे मतभेद व्यक्त करू शकतो, हे शिकले," असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT