Mumbai News : शेतकरी कर्ज कसा फेडणार? या विवंचनेत आहेत. त्यामुळेच शेतकरी आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. मी एका घरात गेलो, त्या ठिकाणीच चार दिवसापूर्वी ३१ वर्षाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्याला १५ दिवसाचे बाळ होते. त्यामुळेच शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफी दिली पाहिजे. यंदाची आपत्ती भीषण आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला मदत केली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करीत शुक्रवारी सीएम फडणवीसांनी केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा पाहणी उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी दोन दिवसापूर्वी दौरा केला. त्यानंतर शनिवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला. यावेळी सीएम फडणवीसांनी (Devendra fadnavis)केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ठाकरे म्हणाले, 'दुष्काळाबाबत बोलणे त्यांना राजकारण वाटत असेल तर वाटू द्या. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफी दिली पाहिजे.'
एकीकडे केंद्र सरकारने पंजाबला 1500 कोटी दिले तर हिमाचल प्रदेशला 1600 कोटी रुपयांची मदत केली आहे. मात्र महाराष्ट्राला मदत करीत असताना प्रस्तावाची वाट पाहत असल्याबद्दल टीका केली.आता हीच खरी वेळ आहे की या शेतकऱ्यांना कर्जाच्या डोंगरातून, संकटातून बाहेर काढायला हवं. सरकारने जी मदत जाहीर केली ती खूप तुटपुंजी आहे, त्याचं कारण म्हणजे एखाद्या वेळेस शेती उध्वस्त झाली, त्याला नुकसानभरपाई दिली, तो शेतकरी कसातरी तग धरू शकतो. पुन्हा पीक घ्यायचं झालं तर किमान 3 ते 5 वर्ष लागू शकतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यातील काही सहकाऱ्यंसह एक दिवसाची मराठवाड्याची भेट घेतली. या वेळची आपत्ती भयाण आणि भीषण आहे. आभाळ फाटले म्हणजे काय ही दाखवणारी परिस्थिती आहे. आत्ताही मराठवाड्यात पाऊस आहे. पावसाने शेतकऱ्याच्या, आपल्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. अनेकांच्या जमीनी खरवडून निघाल्या, पीकं तर उद्ध्वस्त झालीच, घरदारं वाहून गेली. मुलाबाळांच्या वह्या, पुस्तक, दप्तरं, अख्खं आयुष्य वाहून गेलं. संकटात भर म्हणून डोक्यावर कर्जांच ओझं असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वर्षभरापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुक होत होत्या, तेव्हाही शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता. त्यांच्या हातात सोयाबीन, कापूस वगैरे पीक होते, आत्ताचचं सरकार तेव्हा होतं, पण हमीभाव देत नव्हते, त्यामुळे असंतोष होता . हमीभाव खूप कमी मिळत होता म्हणून शेतकऱ्यांमध्ये रोष होता. दुर्दैवाने आता, होत्याचं नव्हतं झालं, जे पीक हाताशी आलं, ते पूर्ण उद्ध्वस्त झालं, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे आवहान केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.