Karan Pawar, Smita Wagh sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Loksabha News : ठाकरेंच्या करण पवारांना चिंता; काँग्रेस, राष्ट्रवादीची मते फुटणार..?

सरकारनामा ब्युरो

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या स्मिता वाघ विरूध्द शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात जोरदार लढत आहे. भाजपतून फुटून बाहेर पडलेल्या करण पवार यांना शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी मिळाली असली तरी त्यांना आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मते ठाकरे गटाकडे ट्रान्सफर होण्याची चिंता आहे, त्यामुळे त्यांची धोक्याची घंटा आता वाजू लागली आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो, गेल्या पंचवीस वर्षापासून या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून येत आहे. गेल्या सन २०१४च्या व २०१९ च्या निवडणूकीत तर भारतीय जनता पक्षाच्या उमेवारांना चक्कल तीन लाख व चार लाखाचा लीड मिळाला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची बाजू उजवी दिसत होती.

अशा स्थितीत भारतीय जनता पक्षातून बाहेर पडलेले खासदार उन्मेश पाटील यांनी आपल्या सोबत पारोळा येथील नगराध्यक्ष करण पवार यांनाही सोबत घेतले दोघांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.

करण पवार यांना शिवसेना ठाकरे गटातर्फे उमेदवारीही देण्यात आली. भाजपतून फुटून बाहेर पडलेल्या पदाधिकाऱ्याला भाजपच्याच विरोधात उमेदवारी देण्यात आली त्यामुळे भाजपसमोर करण पवार यांच्या माध्यमातून मोठे आव्हान उभे राहिले.

भाजपची रणनिती माहिती असलेले खासदार उन्मेश पाटील व उमेदवार करण पवार विरोधात असल्यामुळे भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांना एरव्ही सोपी असलेली निवडणूक कठीण झाली असल्याचे वातावरण निर्माण झाले होते.परंतु आता महाविकास आघाडीत असलेल्या ठाकरे गटात आपल्या मित्र पक्षाच्या मताची चिंता निर्माण झाली आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने प्रचारात आगेकूच केली आहे. त्यांना विजयाचाही दावा केला जात आहे. मात्र, आता ठाकरे गटाला आपले सहयोगी मित्र पक्ष असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची मते शिवसेना ठाकरे गटाला ट्रान्सफर होतील काय?याबाबत चिंता असून त्याबाबत धोका वाटत आहे. गेल्या वेळी भाजपच्या उमेदवाराला साडेचार लाख मताचा लीड होता. हा लीड काढून विजय मिळविण्याचे मोठे आव्हान आहे.

राजकारणातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट॒ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनल फॅलो करा!

नवीन मित्रांची प्रथमच निवडणूक

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना ठाकरे गट या तीन मित्र पक्षाची ही लोकसभा निवडणूक पहिलीच आहे. अनेक वर्षानंतर भारतीय जनता पक्ष विरूध्द शिवसेना ठाकरे गट अशी लढत आहे. शिवसेना ठाकरे गटाला यश मिळण्याची खात्री आहे.

परंतु त्यातच आता धोकाही वाटू लागला असून हाती येत असलेला घास जाण्याची शक्यता वाटत आहे. कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी सभेत व्यासपीठावर दिसत असले तरी तेवढ्याच ताकदीने प्रचारात दिसत नाहीत. त्यामुळे आपल्या मतदारांना ते कसे विनवणी करणार याचाही प्रश्‍न आहे.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT