Ramdas Athawale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shirdi Lok Sabha : रामदास आठवलेंनी सांगितली शिर्डी लोकसभा मतदारसंघ मिळण्यातील तांत्रिक अडचण

Pradeep Pendhare

Nagar News : राहुल गांधी, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि शिर्डी लोकसभा मतदासंघातून लढण्याची इच्छा, अशी चौफेर फटकेबाजी करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कोपरगावमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या. (Ramdas Athawale told about technical difficulty in getting Shirdi Lok Sabha constituency)

रामदास आठवले म्हणाले, "जोपर्यंत हा पठ्ठ्या मोदींसोबत आहेत, तोपर्यंत इंडिया आघाडी मोदींना रोखू शकत नाही. राहुल गांधींनी काँग्रेस जोडो यात्रा काढावी. भारत जोडण्यासाठी मोदी आणि आम्ही सक्षम आहोत. काँग्रेस सोडून गेलेल्या लोकांना पहिले पक्षात आणा आणि पक्ष मजबूत करा, नंतर भारत जोडो यात्रा काढा".

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घराणेशाहीवर उद्धव ठाकरेंनी टीका करणे योग्य नाही. मुख्यमंत्री झाल्यावर आपल्या मुलाला त्यांनी मंत्री केलेच होते. उद्धव ठाकरे परत युतीत आले तर त्यांचे स्वागतच आहे. आज ना उद्या आघाडीला कंटाळून ते परत येतील, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

'प्रकाश आंबेडकर ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रात माझ्याप्रमाणे त्यांच्या पक्षाचीसुद्धा ताकद आहे. त्यांनी अनेक वेळा सांगितले की, मी शिवसेनेसोबत आहे. आघाडीत त्यांना घेतील की नाही सांगता येत नाही आणि ते जातील का नाही, हे सुद्धा सांगता येत नाही. चारही पक्षांना 12-12 जागा हा आंबेडकर यांचा फॉर्म्युला महाविकास आघाडीने मान्य करावा. आंबेडकर आघाडीत गेले तरी महायुतीला फटका बसणार नाही', असा दावाही रामदास आठवले यांनी केला.

'शिर्डी लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगून याबाबत विखे आणि पिचड यांच्याशी चर्चासुद्धा झाली आहे. मात्र, आता एकनाथ शिंदे सोबत असल्याने त्यांचा विद्यमान खासदार आल्याने तांत्रिक अडचण आहे. शिर्डीची जागा भाजपला मिळाल्यास मी उमेदवार असू शकतो. मात्र अंतिम निर्णय सर्वांना विचारात घेऊन केला जाईल आणि शिर्डीसाठी आग्रही राहील', असे रामदास आठवले यांनी म्हटले.

रामदास आठवलेंच्या कवितेने खाल्ला भाव

मला नाही कशाची हाव...म्हणूनच मी आलोय शिर्डी कोपरगाव,

मी घालत असतो अन्यायावर घाव,

उलटून टाकतो दुश्मनाचा डाव.

मी घेऊन माझ्या भीमाची आन,

मजबूत करणार बाबासाहेबांचे संविधान,

मला आहे दलित चळवळीचा भान,

वेळ आली तर बाबासाहेबांसाठी देणार जान.

माझ्या लग्नावेळी अनेकांनी लाडू खाल्ले,

कारण लाडू देणारे होते शंकरराव कोल्हे,

अबकी बार ४०० पार इंडियाची आघाडीची होणार हार.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT