Nagpur News : राहूल गांधी यांनी महाराष्ट्राची विधानसभा भाजपने चोरली, अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन मॅचफिक्सिंग केली होती, असे आरोप केले होते. ज्यामुळे सध्या राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. अनेक नेते आता उघडपणे निवडणूक आयोगाच्या कारभारावर बोलू लागले आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही निवडणूक आयोग, ईव्हीएम आणि पाच महिन्यात अचानक वाढलेले मतदार याबाबत शंका व्यक्त केलीय. त्यांनी, निवडणूक प्रक्रियेतून सर न्यायाधीशांना बाजूला का केलं? उमेदवाराला सीसीटीव्हीचे फुटेज देण्याची तरतूद का काढूण टाकली? अशी विचारणा निवडणूक आयोगाला केली आहे.
राहूल गांधी यांनी आपल्या लेखात जे काही प्रश्न उपस्थित केले ते योग्यच आहेत. पाच वर्षांत कधी मतदार वाढले नाहीत तेवढे पाच महिन्यात कसे वाढले? अशी विचारणा त्यांनी केली आहे. यापूर्वी उमेदवाराने मागणी केल्यास सीसी टीव्ही फुटेज देण्याची तरतूद होती. ती काढून टाकल्याने शंकेला वाव आहे. काही तरी गडबड केल्याशिवाय कोणी नियम बदलवत नाही किंवा माहिती देण्यास टाळाटाळ करीत नाही.
निवडणूक आयोगाच्या विरोधात अनेक पराभूत उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपने निवडणूक जिंकली आहे. त्यानंतर तातडीने नियमांमध्ये बदल करण्यात आले. याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले. काटोल विधानसभा मतदारसंघातून अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख हेसुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यांनीसुद्धा कोर्टात धाव घेतली आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. या बाबतीत आपल्याला काही माहीत नाही. काही लोकांच्या तशा भावना आहेत. त्या त्यांनी बोलून दाखविल्या. पक्ष जो काही या बाबत निर्णय घ्यायचा तो घेईल.
सध्या मात्र या बाबत काहीच चर्चा नाही. दोन्ही ठाकरे एकत्र येत असले तर ते चांगले आहे. दोघे भाऊ एकत्र आलेच पाहिजे. शरद पवार आणि अजित पवार हे अनेक संस्थांचे पदाधिकारी आहेत. संबंधित संस्थांचा बैठका, कार्यक्रमांना त्यांना जावे लागते. एकत्र यावे लागते. याचे राजकीय अर्थ काढणे योग्य नाही, असेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.