Nagpur News : औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही दंगल पूर्वनियोजित होती, असा दावा विधानसभेत केला आहे. या घटनेला हिंदू विरुद्ध मुस्लिम असे स्वरूप दिले जात आहे. या घटनेमागची सत्यात जाणून घेण्यासाठी काँग्रेसने एक सत्यशोधन समिती स्थापन केली आहे. ही समिती शनिवारी नागपूरमध्ये दाखल झाली आहे. मात्र, समितीला दंगलग्रस्त भागात जाण्याची पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
या परिसरात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे कोणालाही जाता येणार नाही. कायद्याचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्तांनी काँग्रेसच्या समितीला दिला. त्यामुळे सत्य शोधन समितीने रविभवन येथे बैठक घेऊन विविध भागातील नागरिक आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली.
काँग्रेसच्या सत्यशोधन समितीचे अध्यक्ष गोव्याचे प्रभारी आणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे (Manikrao thackeray), समितीचे सदस्य साजिद पठाण, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल गुडधे यांनी रविभवन येथे बैठक घेतली.
माणिकराव ठाकरे म्हणाले, 'आम्ही सत्य जाणून घेण्यासाठी नागपूरमध्ये आलो आहोत. नागपूर शहरात शांतता राहावी असेच आमचे प्रयत्न आणि इच्छा आहे. मात्र, पोलिसांनी आम्हाला सत्य जाणून घेण्यापासून रोखले. ही राज्य सरकारची दडपशाही आहे. मात्र, सत्य शोधण्यासाठी आमची चार दिवस नागपूरमध्ये थांबण्याची तयारी आहे. आज ना उद्या केव्हा तरी दंगलग्रस्त भागात जाऊ. आम्ही नेमके काय घडले, कोणामुळे घडले, प्रशासन आणि पोलिसांची भूमिका या सर्वांचा बारईकाने अभ्यास करू.'
तत्पूर्वी आम्ही काँग्रेसचे (Congress) कार्यकर्ते आणि इतर जणांचे म्हणणे ऐकून घेतले. त्याच्या नोंदी करून ठेवण्यात आल्या आहेत. जे काँग्रेसचे नाही त्यांनाही आम्ही बोलावले होते. त्यांच्याशीसुद्धा चर्चा केली. आम्ही सत्य शोधन समितीचा अहवाल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सादर करू. तो अहवाल राज्यपालांकडे सादर केला जाणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
लोकांसोबत केलेल्या चर्चेवरून या दंगलीस विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचे दिसून येते. कुराणाचे आयात असलेली चादर जाळण्यात आली. त्यामुळे मुस्लिमांचा भावना दुखावल्या. पोलिसांनी एकतर संवेदनशील भागात आंदोलनाची परवानगीच द्यायला नको होती. आंदोलन झाल्यानंतरही सुरक्षेची जबाबदारी पोलिसांनी प्रामाणिकपणे पार पाडल्याची दिसत नाही, असे माणिकराव ठाकरे म्हणाले.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर कुठलीच कार्यवाही केली नाही. पक्षपातीपणाचा आरोप होऊ नये याकरिता पाहुण्यांप्रमाणे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. जुजबी कलम लावून त्यांना सोडून देण्यात आले. मात्र, दुसरीकडे मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांना थेट देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले असल्याचे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.