Nagpur, 12 July : जनसुरक्षा विधेयक विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात मांडण्यात आले आहे. सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना शहरी नलक्षवादी ठरवले जाणार आहे, मुस्कटदाबी या कायद्याच्या माध्यमातून केली जाणार असल्याचा आरोप विरोधकांमार्फत केला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी या विधेयकास कडाडून विरोध दर्शविला आहे. त्यावर विधेयकाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘उद्धव ठाकरे यांनी कधीतरी खरं बोलले पाहिजे. त्यांनी युवा पिढीची काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला ठाकरे यांना दिला.
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, हे विधेयक तयार करताना सर्व विरोधकांना विश्वासात घेण्यात आले होते. त्यांच्या सूचनाही स्वीकारण्यात आल्या आहेत. जनसुरक्षा विधेयकाचा ड्राफ्ट तयार करण्यासाठी एक संयुक्त समिती तयार करण्यात आली होती. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, भास्कर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता.
संयुक्त समितीच्या पाच बैठका झाल्या आहेत. समितीच्या सर्व सदस्यांनी जनसुरक्षा विधेयकाच्या (Jansuraksha Bill) ड्राफ्टचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांनी सुचवलेल्या सुधारणा आम्ही केल्या आहेत. विरोधी पक्षातील सर्व नेते असलेल्या संयुक्त समितीने त्या विधेयकाचा ड्राफ्ट मान्य केला आणि त्यानंतर विधानसभेत तो एक मताने पारित झाला. आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
जनसुरक्षा विधेयक कुठल्याही राजकीय पक्षाच्या, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटनांच्या विरोधात नाही. माओवादी विचारसरणीला आळा घालणारा प्रस्तावित कायदा आहे. जनतेची आणि समाजाची मालमत्ता नष्ट करणारे नक्षलवादी असतात. या नक्षलवाद्यांना साथ देणाऱ्या व त्यांना फंडिंग करणाऱ्या संघटना शहरी भागात कार्यरत आहेत. अनेक वेळा विद्यापीठात राहून नवीन पिढीला नक्षली विचारांकडे वळविण्याचा प्रयत्न केला जातो. कडव्या डाव्या विचारसरणीचे बिजारोपण त्यांच्या मनात केले जाते. जेव्हा बंदुकीतून लढता येत नाही, तेव्हा ते असा भ्रम निर्माण केला जात आहे.
संविधान, लोकशाही, न्यायालय मान्य नाही आणि व्यवस्थेविरोधात समाजामध्ये असंतोष निर्माण करणाऱ्या ज्या संघटना आहेत, त्यांना जेरबंद करण्यासाठी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक कायदा तयार करण्यात आले आहे. या कायद्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत एक मताने मान्यता देण्यात आली आहे. मराष्ट्रातील शहरांमध्ये काम करणाऱ्या फ्रंटल ऑर्गनायझेशनला आळा घालण्याचे काम या कायद्याच्या माध्यमातून केले जाईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात जे आक्षेप घेतले आहेत, विरोधात वक्तव्य केले आहे, त्याची सर्व उत्तरे सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहेत. कायद्याचा मसुदा तयार करण्यापूर्वी तो जनतेच्या न्यायालयात टाकण्यात आला होता. १२ हजार मते आम्ही नोंदवून घेतली आहेत, असा दावाही बावनकुळे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.