Ajit Pawar, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Mahayuti News : "हवा डोक्यात जाऊ देऊ नका..."; शपथविधीआधीच एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर

Maharashtra Coalition Government Tensions Before Oath: एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रि‍पदावर ठाम असल्यामुळे महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उशीर होत असल्याचं सांगितलं जात आहे. कारण शिवसेनेच्या नेत्यांकडून शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करावं अशी मागणी केली जात आहे. तर भाजपकडून फडणवीसांच्या नावाला पसंती देत आहे. त्यामुळे युतीतील धुसफूस बाहेर यायला सुरूवात झाली आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 27 Nov : महाराष्ट्रात सध्या महायुतीचा शपथविधी कधी होणार आणि मुख्यमंत्रि‍पदाची शपथ कोण घेणार? याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. शिवाय सत्ता स्थापन करण्यासाठीच्या घडामोडी जोरदार सुरू आहेत. मात्र, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रि‍पदावर ठाम असल्यामुळे युती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उशीर होत असल्याचं सांगितलं जात आहे.

कारण शिवसेनेच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करावं अशी मागणी केली जात आहे. तर भाजप शिंदेंना विरोध करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाला पसंती देत आहे. त्यामुळे युतीतील धुसफूस बाहेर यायला सुरूवात झाली आहे.

एकीकडे वरिष्ठांमध्ये मुख्यमंत्रि‍पदावरून रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे महायुतीमधील स्थानिक नेत्यांमधील खदखद देखील बाहेर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

थोरवे यांनी सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) महायुतीतील आमदार पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचा आणि अपक्षांना मदत केल्याचा आरोप केला आहे. महेंद्र थोरवे म्हणाले, "माझा पराभव करण्यासाठी अनेक अदृश्य शक्ती कार्यरत होत्या. महायुतीत असूनही त्यांनी मला पाडण्याचे प्रयत्न केले.

परंतु त्यांचा हा डाव निष्ठावंत शिवसैनिकांनी उलटवल्यामुळे माझा विजय झाला आणि माझ्या मतदासंघातून सुनील तटकरेंचा पराभव झाला." शिवाय यावेळी थोरवे यांनी भरत गोगावले यांना पालकमंत्री करावं अशी मागणी देखील केली. थोरवेंच्या याच आरोपांना सुनील तटकरेंच्या कन्या आणि श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे.

आदिती म्हणाल्या, "महेंद्र थोरवे काठावर वाचले आहेत. त्यांना मी फारसं महत्त्व देत नाही. त्यांनी आपला मतदारसंघ सांभाळावा. यशाची हवा डोक्यात जाऊ देऊ नये. यश नम्रतेने स्वीकारायचं असतं. राज्यात आता महायुतीचे सरकार येत असून कोण कुठला मंत्री होणार हे पक्षाचे नेते ठरवतात, त्याबाबतचा निर्णय स्थानिक आमदार घेत नाहीत."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT