Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad : ‘आनंद दिघेंचा मृत्यू झाला त्यावेळी …’, जितेंद्र आव्हाडांचं विधान!

सरकारनामा ब्यूरो

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या ठिकाणी खरंतर दोन शिवसैनिकांमध्ये लढत होत आहे. महायुतीने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के यांना रिंगणात उतरवले आहे. तर त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे हे आहेत.

दरम्यान, नरेश म्हस्केंच्या प्रचारावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजन विचारेंबाबत केलेल्या वक्तव्यावर राजन विचारेंकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. शिवाय ठाणेकरांचा भावनिक मुद्दा असलेल्या आनंद दिघेंवरूनही जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राजन विचारे आनंद दिघे यांचे नकली शिष्य, तर नरेश म्हस्के(Naresh Mhaske) असली शिष्य आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडणाऱ्यांबरोबर राजन विचारे गेले आहेत. आनंद दिघे यांना उद्धव ठाकरे यांनी कायम त्रास दिला, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे ठाण्यातील नेते शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही यामध्ये उडी घेत, आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर काय काय घडामोडी घडल्या हे सांगितले आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार आव्हाड म्हणाले, ''मला मिलिंद नार्वेकरांचा फोन आला होता, उद्धव ठाकरेंनी तुम्हाला बोलावलं आहे, आनंदचा मृत्यू झालेला आहे.

कोणाला काहीच माहीत नव्हतं, मी शरद पवारांना(Sharad Pawar) सांगितलं. मला विचारलं गेलं साधारण लोक किती आहेत, तत्काळ गाडीत बस अन् निघ तिथून आणि त्यानंतर लगेच दंगल सुरू झाली. त्यामुळे खोटेपणाला मर्यादा असते, एखाद्याच्या नावाने सहानुभूती मिळवायची ते किती याचं वास्तव जाणणारी लोक आहेत.''

याचबरोबर आव्हाड म्हणाले, आनंद दिघे यांचा मृत्यू झाला तेव्हा हॉस्पिटलमध्ये कोण कोण होतं, मला नाव घ्यायला भाग पाडू नका. तेव्हा मी स्वत: तिथे हजर होतो. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय पातळीवर बोलावं, गल्लीबोळात बोलू नये. मणिपूर प्रकरण, ब्रृजभूषण, चीन, जाहीरनाना यावर बोला. तेच तेच आनंद दिघे यांचा मुद्दा काढला जातो. आता नवीन पिढी आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT